लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सीबीएसई आणि COEMPT यांच्या संगनमतावरून पुन्हा एकदा हल्ला केला आहे. त्यांनी यावेळी 18 वर्षीय सार्थक सिद्धांत आणि निसर्गचं उदाहरण देत जोरदार टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटत तरुणांनी बोलू नये, प्रश्न विचारू नयेत, रील्स बनतव राहाव्यात. पण तरुण बोलत आहेत. पर्याय काढत आहेत. असं म्हणत राहुल गांधी यांनी सार्थक आणि निसर्ग यांचं कौतूक करून सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
राहुल गांधी पुढं म्हणाले, देशातील हा 18 वर्षांचा तरुण सीबीआयपेक्षाही हुशार असल्याचं सिद्ध झाले. तरुणांचा हा विजय म्हणजे सरकारचा खरा पराभव आहे. झारखंडमधील रांचीचा रहिवासी असलेल्या सार्थकनेही यावर्षी 12वी परीक्षा दिली होती. कमी गुण मिळाल्यानंतर त्याने आपल्या स्कॅन केलेल्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याची विनंती केली होती. चुकीने गुण कमी केल्याचे आणि इतर समस्यांचे आपले अनुभव सार्थकने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सार्थकने सीबीएसई सुधारणांवरील संसदीय स्थायी समितीला 500 पानांचे सादरीकरणही सादर केलं आहे.
उत्तरपत्रिका पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी CBSE’ने 12 वीच्या अर्जाची मुदत वाढवली
राहुल गांधी यांनी काही प्रश्न विचारले
राहुल गांधी: हे चांगलं आहे की वाईट? याबद्दल तुझं काय मत आहे?
सार्थक: कोणत्याही नागरिकाने कोणत्याही गोष्टीबद्दल जे करायला हवं, तेच मी केलं. हा आपला देश आहे, आणि प्रत्येकामध्ये गोष्टी समजून घेण्याची आणि व्यवस्था पारदर्शक करण्यासाठी काम करण्याची पुरेशी नागरिक जाणीव असायला हवी. कितीही त्रुटी असल्या तरी, त्या सुधारण्यासाठी आपण काम केलं पाहिजे.
राहुल गांधी: जे घडलं त्याबद्दल तुझं काय मत आहे?
सार्थक: निसर्ग अधिकारी एक एथिकल हॅकर आहे. त्याने मला एका ग्रुप चॅटवर OSM पोर्टलमधील त्रुटीबद्दल सांगितलं. मी त्याबद्दल शोध घेतला आणि मला आढळलं की हे सर्व OSM मूल्यांकनासाठी काम करणाऱ्या ‘ऑनमार्क’ नावाच्या एडटेक सोल्युशन्स कंपनीने तयार केलं होतं. मी याचा अधिक तपास केला. निसर्गने मला ‘ऑनमार्क’ वापरणाऱ्या इतर विद्यापीठांची माहितीसुद्धा पाठवली. तिथेही मला त्रुटी आढळल्या. त्यानंतर मला आश्चर्य वाटलं की CBSE इतक्या त्रुटी असलेल्या कंपनीचा वापर का करत आहे.
राहुल गांधी: तर ही मोठी व्यवस्था का नाही शोधू शकत?
सार्थक: मला वाटतं की हे लोक आपलं काम जबाबदारीने करत नाहीत. निविदा तीन वेळा बदलली गेली, नियम बदलले गेले आणि त्यानंतर COEMPT एड्युटेकला कंत्राट देण्यात आलं. अनियमितता उघडकीस आल्यावरही कोणतीही चौकशी झाली नाही आणि नियम वारंवार बदलले गेले. असं असू शकतं की ते (CBSE) त्या कंपनीला प्राधान्य देतात किंवा त्यांना आपल्या 17 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी नाही.
राहुल गांधी: इतका जिज्ञासू कसा काय असू शकतो?
सार्थक: मला वाटतं की देशाची शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा मारत आहे. मला असं वाटतं कारण माझे आई-वडील दोघेही कॉम्प्युटर इंजिनिअर होते. मी CBSE च्या सर्व 576 निविदा शोधल्या. मी GEM पोर्टलवरही शोधलं, पण तिथे काहीच सापडलं नाही. त्यानंतर, मी गुगलवरून माहिती गोळा केली. COEMPT ला निविदा देण्यापूर्वी, ती दोनदा रद्द करण्यात आली होती. OSM प्रणाली सुरू होण्याच्या केवळ 74 दिवस आधी ही निविदा त्या कंपनीला देण्यात आली होती.
