Video : सीबीएसईच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा थेट आरोप
राहुल गांधी यांनी उत्तरपत्रिका तपासणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत केंद्र सरकार आणि सीबीएसई बोर्डावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
सीबीएसईच्या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला आहे. (Rahul Gandhi) विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका स्वयंचलित रोबोटिक स्कॅनरऐवजी मोबाईल फोनने स्कॅन करण्यात आल्या असा थेट आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. ऑन-स्क्रीन मार्किंग सिस्टीमची निविदा ऑगस्टमध्ये पुन्हा जारी करण्यात आली होती. त्यावेळी अनेक अटी काढून टाकण्यात आल्या आणि स्कॅनिंगची गुणवत्ता 300 डीपीआयवरून 200 डीपीआयपर्यंत कमी करण्यात आली असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.
अस्पष्ट उत्तरपत्रिका, गहाळ झालेली पाने आणि अनेक प्रती स्कॅन न होणे या केवळ तांत्रिक चुका नाहीत. त्यांच्या मते, एका विशिष्ट विक्रेत्याला फायदा व्हावा यासाठी केलेल्या कराराचा हा परिणाम आहे. तसंच, ही एक फसवणूक आहे. आणि ज्या प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण चुकीच्या पद्धतीने मोजले गेले आहेत, तो या फसवणुकीचा बळी आहे असंही ते म्हणाले.
धर्मेंद्र प्रधान आपल्या पदावर कायम आहेत. मोदींचे मौन आता केवळ उदासीनता राहिलेली नाही; ते या गुन्ह्यातील त्यांच्या सहभागाचे द्योतक आहे. जेव्हा शिक्षणाला सेवेऐवजी धंद्यात बदलले जाते, तेव्हा चुका सुधारल्या जात नाहीत. त्या अधिकच वाढतात आणि याची अंतिम किंमत आपली मुले मोजत आहेत आपला वेळ, आत्मविश्वास आणि भविष्य गमावून असंही ते म्हणाले.
NEET ची परीक्षा, लष्कराची सुरक्षा! भारतीय लष्कराला पाचारण करणार, शिक्षणमंत्र्यांची घोषणा
त्याचबरोबर, विद्यार्थी सिद्धांत कुमारने कथितरित्या स्कॅन केलेल्या प्रतींचे फोटो शेअर केले. त्याने लिहिले, “सीबीएसई, तुम्ही म्हणालात की या प्रती स्कॅन करण्यासाठी तुम्ही स्कॅनर वापरले. आता या प्रती सार्वजनिक पाहण्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत, तर कृपया स्पष्ट कराल का की स्कॅन केल्यावर कोणत्या प्रतींना ड्रॉप शॅडो आली आहे? आणि या तीन घड्या कशा पडल्या असा प्रश्न उपस्थित केला आहे.
राहुल गांधी यांनी उत्तरपत्रिका तपासणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत केंद्र सरकार आणि सीबीएसई बोर्डावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी एक्स पोस्टवर लिहिले की, “खिसेकापूंपासून सावध रहा – आज तो सीबीएसईच्या आत बसला आहे.” सीबीएसईच्या चुकीमुळे तुमचे गुण चुकले तर तुम्हाला काय मिळते? एका मुलाला एका बिलासाठी, एका बरोबर उत्तरपत्रिकेसाठी ₹2,000 पर्यंत पैसे द्यावे लागू शकतात.
कल्पना करा, जेव्हा 400,000 विद्यार्थ्यांनी असे अर्ज सादर केले आहेत, तेव्हा CBSE किती कमाई करत असेल. जेव्हा फोनवरून स्कॅनिंग केले जाते, तेव्हा चुकीचे मार्किंग अटळ असते. आणि ते दुरुस्त करून घेण्याचा खर्च ते मुले भरत आहेत. CBSE ची चूक. मुलांना शिक्षा आणि सरकारची कमाई. ज्या धाडसी तरुणांनी CBSE आणि मोदी सरकारला साधे प्रश्न विचारले, त्यांना उत्तरांऐवजी अपमान मिळाला.” व्हिडिओमध्ये, विद्यार्थ्यांनी राहुल गांधींना सांगितलं, “उत्तरपत्रिकेबद्दल प्रश्न विचारल्याबद्दल आम्हाला देशद्रोही, डीप स्टेटचे एजंट (हेर), दहशतवादी आणि पाकिस्तानी म्हटलं गेलं. राहुल हसले आणि म्हणाले, 17 वर्षांचे डीप स्टेट एजंट असा टोलाही त्यांनी लागवला आहे.
CBSE अध्यक्ष – ट्रांसफ़र।
CBSE सचिव – ट्रांसफ़र।
एक-सदस्यीय “जाँच” समिति – गठित।
और असल ज़िम्मेदार, धर्मेंद्र प्रधान – सुरक्षित।अधिकारियों को हटा दिया। मंत्री को बचा लिया।
यह जवाबदेही नहीं – यह cover-up है।
हमारी माँग आज भी वही है: शिक्षा मंत्री को बर्ख़ास्त किया जाए और… https://t.co/LUrM8top5y
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 2, 2026