Sonam should not be sent before May 31 Astrologer had predicted Raja murder case of Indore: मध्यप्रदेशमधील इंदौरमध्ये एका नववधूने चक्क आपल्या हनिमूनच्या (Raja murder case of Indore) काळातच आपल्या पतीचा जीव घेतला आहे. या धक्कादायक घटनेनंतर तिने स्वतःच पोलिसांसमोर कबुली देत आत्मसमर्पणही केले. मात्र या घटनेने सध्या सर्वत्र खळबळ माजली आहे. त्यानंतर आता या घटनेबाबत आणखी एक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे या लग्नाबाबत ज्योतिषाने अगोदरच भाकीत केली होती. जी भाकीतं अगदी तंतोतंत खरी ठरली आहेत.
नेमकं प्रकरण काय?
मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये राजा रघुवंशी आणि सोनम नावाच्या तरूणीचं लग्न 11 मे रोजी झालं होतं. ते 20 मे रोजी हनिमुनसाठी गेले. शिलॉंगजवळील (Raja Raghuvanshi Murder Case) मावलाखियात गावात होमस्टे करून राहिले. 23 रोजी सकाळी त्यांनी चेकआऊटकेलं. पण 24 मे रोजी सोहरीम जवळ त्यांनी भाड्याने घेतलेली स्कूटर बेवारस अवस्थेत आढळली. पण 2 मे रोजी जे घडलं, ते अत्यंत भयानक होतं. वायसाडोंग धबधब्याजवळ एका खोल दरीत राजा रघुवंशीचा मृतदेह आढळला. हातावरील टॅटूने त्याची ओळख पटली.
राजाचं अपहरण करून हत्या
मेघालय पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली. परंतु सोनम अजूनही बेपत्ताच होती. राजाचं कुटूंब सीबीआय चौकशीची मागणी करत होतं. स्कूटी जिथे सापडली होती, त्याच्यापासून 25 किलोमीटर अंतरावर राजाचा मृतदेह (Sonam Bewfa Hai) आढळला. राजाचं अपहरण करून हत्या करण्यात आली. सोनमचंही अपहरण झालं असावं, अशी शंका व्यक्त केली जात होती.
इंदौरच्या राजा खून प्रकरणात नवा ट्वीस्ट; पत्नी सोनमने दिली ‘ही’ धक्कादायक माहिती
राजाची सोन्याची साखळी, हिऱ्याची अंगठी, ब्रेसलेट आणि पाकिट गायब होतं. त्यामुळे चोरीसाठी त्याची हत्या करण्यात आल्याचं संशय सगळीकडून व्यक्त केला जात होता. इंदौरमध्ये राजावर अंत्यसंस्कार पार पडले. सोनमला शोधण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ यांच्या मदतीने शोध मोहिम सुरू आहे. तर राजाचा मोबाईल अन् हत्येत वापरलेलं शस्त्र पोलिसांनी जप्त केला होता. पण या बहुचर्चित प्रकरणात जे सत्य बाहेर आले, त्याने सर्वांनाच धक्का बसलाय. सोनम रघुवंशीला गाझीपूर येथून अटक करण्यात आलीय. तिच्यासोबत आणखी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हनिमुनच्या वेळीच कारस्थान रचले
पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, पत्नी सोनम रघुवंशी यांनी पती राजा रघुवंशी यांना मारण्यासाठी मारेकऱ्यांना कामावर ठेवले होते. हनिमुनच्या वेळीच तिने हे कारस्थान रचले होते. असं काही विपरीत घडेल, याचा विचार सु्द्धा राजाच्या कुटुंबाने केला नव्हता. मेघालयचे सीएम संगमा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की, राजा हत्याकांडात 7 दिवसांत मध्य प्रदेशातील 3 हल्लेखोरांना अटक केली आहे. संबंधित महिलेने आत्मसमर्पण केलंय.घटनेनंतर सोनम रघुवंशीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सोनमने नवऱ्याला रस्त्यातून का हटवले? तिचे दुसऱ्या कोणावर प्रेम होते का? राजा रघुवंशी यांची हत्या कोणत्या कारणामुळे केली? पोलीस या सगळ्या प्रश्नांचा शोध घेत आहेत.
काय आहेत ही भाकीतं?
ज्योतिषी एनके पांडे यांनी संबंधित आरोपी सोनम आणि तिचा पती राजा यांच्या कुंडल्या लग्नासाठी जुळवल्या होत्या. त्यावेळी दोघांच्याही कुंडलीत मंगळ दोष होता. जर वधू आणि वर मंगळ असणारे असतील तर ते दोष मानले जात नाही. त्याचबरोबर त्यांच्या लग्नाची तारीख अगोदर 16 मे 2025 होती त्यानंतर काही कारणांमुळे हे लग्न 11 मे रोजी करण्यात आलं.
लायकीपेक्षा जास्त बोललात, परत बोललात तर…’त्या’ वक्तव्यावरून राणेंचा महाजनांना
मात्र तरी देखील सोनमची माहेरून सासरी पाठवणी ही 31 मे पूर्वी करू नका. 31 मे रोजी दुपारी किंवा सायंकाळी तिची पाठवणी करा असेही त्यांनी सांगितलं. मात्र हे न ऐकता तिच्या घरच्यांनी लग्नाच्या तीन दिवसातच तिची पाठवणी केली. त्यानंतर लगेचच सोनम आणि तिचा पती राजा हे हनिमूनला जाताच बेपत्ता झाले. त्यावेळी घरच्यांनी पुन्हा एकदा या ज्योतिषाकडे जाऊन त्यांचा सल्ला घेतला. त्यावेळी त्यांनी सोनमचा फोटो दारावर उलटा लटकवण्यास सांगितलं जेणेकरून ती परत येईल.
पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; हुंड्यामुळं होणाऱ्या छळातून विवाहितेची आत्महत्या
त्याचबरोबर ज्योतिषी एनके पांडे यांनी या प्रकरणात अनेक भाकीतं केली होती. जी अगदी तंतोतंत खरी ठरली आहेत. ज्यामध्ये त्यांनी पाच जून पर्यंत राजा आणि सोनमला कुठेही बाहेर जाण्यास मनाई केली होती. पण त्या दोघांनी प्रवासाची योजना आखली. पण दारावर फोटो उलटा लटकवल्याने सोनम जिवंत परतली. सनमचे वडील देवीसिंह रघुवंशी यांनी सांगितले की, लग्नानंतर जावयाला दीड महिना घराबाहेर पडता येणार नाही. म्हणून त्यांनी 5 जूनचा शुभ मुहुर्त काढला होता. परंतु 21 मे रोजी सोनम आणि राजा कामाख्या देवीला निघाले. कारण या सर्व तारखांच्या डेडलाईन अगोदर केलेल्या गोष्टी या नववधू आणि वराच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या ठरू शकतात असा यामागचा अर्थ होता.