Download App

Wayanad Landslide: वायनाडमधील शोध मोहिम अंशत: थांबवली; दहा दिवसांनंतर लष्कराचा निर्णय

वायनाडमधील भूस्खलनातील बेपत्ता लोकांच्या शोधार्थ दहा दिवसांपासून अथक मोहीम सुरू असताना आज लष्कराने अंशत: माघारी जाण्याचा निर्णय घेतला.

  • Written By: Last Updated:

Wayanad Landslide Disaster : केरळच्या वायनाडमध्ये एचानक होत्याचं नव्हत करणारी दुर्घटना काही दिवसांपूर्वी घडली. येथे रात्रीत दोनदा भूक्खलन झालं. त्यामध्ये सुमारे 400 लाोकांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान, अनेकांनी प्रसंगावधान राखून पोलीस अधिकारी, बचाव पथकाला फोन केले. मात्र, सर्वानांच सुरक्षित ठिकाणी जाता आलं नाही. (Wayanad Landslide) एका पोलीस अधिकाऱ्याने दोन पर्यटकांना वाचवल्यानंतर अन्य लोकांच्या मदतीसाठी ते पुढे सरकले. परंतु, पाण्याचा प्रवाह एवढा प्रचंड होता की त्यांना डोळ्यादेखत वाहून जाणारे लोक पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. गेली दहा दिवसांपासून अथक शोध मोहीम सुरू असताना आज लष्कराने अंशत: माघारी जाण्याचा निर्णय घेतला. पीडब्लूडी खात्याचे मंत्री पी. मोहंमद रियास यांनी काही प्रमाणात लष्कर माघार घेत असल्याची घोषणा केली.

Neeraj Chopra: नदीम पण आमचाच मुलगा; आम्ही समाधानी आहोत, नीरजच्या आईची प्रतिक्रिया

मदतीसाठी आकांत

वायनाडच्या भूस्खलनाला आठवडा लोटला असून, त्यात असंख्य लोकांचा जीव गेला आहे. अनेकजण बेपत्ता झाले आहेत. मात्र, त्या भीषण रात्रीची आठवण आजही मेप्पादी पोलीस ठाण्याचे एक पोलीस अधिकाऱ्यास त्रास देत आहे. चुरलमला भागातील विनाशकारी भूस्खलनात जीव वाचवताना अपुऱ्या पडलेल्या मदतीची आठवण वेदनादायी ठरत असल्याचं ते म्हणतात. पोलीस अधिकारी जिबलू रेहमान यांनी भूस्खलनानंतर तातडीने कारवाई करत ओडिशाच्या दोन पर्यटकांना ढिगाऱ्याखालून वाचवलं होतं. त्या दिवशी रेहमान घटनास्थळी पोचले तेव्हा वाचवलेल्या लोकांपैकी एकाचा हात पाय मोडला होता, तर दुसऱ्याचे कपडे फाटलेले होते. ते मदतीसाठी आकांत करत होते असंही ते यावेळी म्हणाले.

हतबल झालो होतो

मला आणखी दोन लोक वर अडकल्याचं सांगितलं. मी त्यांना टी शर्ट आणि कोट दिला. तेथे तातडीने आलेल्या स्थानिक तरुणांकडं त्यांना सोपावलं. नंतर मी दोघांच्या शोधार्थ वर गेलो. वरच्या दिशेने गेलो असताना तेथे मोठा आवाज ऐकू आला. मोठे भूस्खलन झाल्याचं माझ्या लक्षात आलं. पण तेथे जाता येत नसल्याने सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी मला आणखी वरच्या भागाकडे जावे लागले. तेव्हा पाणी वाहत होते आणि त्यात झाडे, चिखल होते. अनेक जणांना डोळ्यादेखत ढिगाऱ्यासह वाहताना पाहिलं. परंतु त्यांना वाचवण्यासाठी काहीच करता येत नव्हत अशी खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली. आपण पूर्णपणे हतबल झालो होतो असंही रेहमान म्हणतात.

Video: कोल्हापूरकर हळहळले; संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह भीषण आगीत बेचिराख

मदतकार्याचा दहावा दिवस

वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनातील मदतकार्याचा आज दहावा दिवस होता. आज पुन्हा सनराईज व्हॅलीत बेपत्ता लोकांसाठी शोध मोहिम राबविण्यात आली. यावेळी श्‍वान पथकही सामील करण्यात आलं. चुरलमला, मुंडक्कई, समलीमट्टममध्ये नियमित शोध मोहीम सुरूच राहणार आहे. भूस्खलनानंतर १६ मदत छावण्यात १९६८ नागरिक राहत आहेत. पण त्यांना आता स्थानांतरित केले जाणार असून त्यांच्यासाठी भाड्याने फ्लॅट, घर शोधण्याचं काम सुरू झालं आहे. त्यांचे भाडे केरळ सरकारकडून दिले जाणार आहे. सध्या अनेक शाळांत नागरिक राहत आहेत. परंतु, शाळा सुरू करण्यासाठी त्यांना अन्य ठिकाणी नेणं गरजेचं आहे. पुनर्वसनाच्या दुसऱ्या टप्प्यात भाड्याच्या घरातून त्यांना नव्याने निर्माण होणाऱ्या नागरी वसाहतीत कायमस्वरूपी नेण्यासाठी कार्यवाही सुरू होईल, असं केरळ सरकारने सांगितलं. यादरम्यान, केरळ सरकारने बेपत्ता १३८ जणांची यादी जारी केली आहे. लष्कर आणि आपत्कालीन विभागाला चेलियार नदी आणि परिसरात ७ ऑगस्टपर्यतच्या शोध कार्यात १९२ अवयव सापडले आगेत.

follow us