Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानीनगर (Meghaninagar) परिसरात 12 जून गुरुवारी दुपारी 1.30 च्या सुमारास एअर इंडियाचे प्रवासी विमान कोसळल्याने (Ahmedabad Plane Crash) एकच खळबळ उडाली आहे. या विमानात क्रू मेंबर्ससह 242 लोक असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातासंबंधीत अनेक फोटो आणि सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे बचावकार्य देखील सुरु झाला आहे. मात्र आतापर्यंत या अपघातामध्ये किती लोकांचा जीव वाचला आहे आणि किती लोकांचा मृत्यू झाला आहे याबाबात कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
तर दुसरीकडे विमानात कोणती सीट सर्वात जास्त सुरक्षित असेत ज्यामुळे अपघातानंतर जीव वाचू शकतो असा प्रश्न आता सोशल मीडियावर विचारण्यात येत आहे. जर तुम्ही मागील काही विमान अपघात बघितले तर या अपघातात बहुतेक वाचलेले लोक हे मागील सीटवर बसलेले असतात. गेल्या वर्षी दक्षिण कोरियामध्ये (South Korea) विमान अपघात झाला होता तेव्हा संपूर्ण विमान जळून खाक झाले होते फक्त त्याचा मागचा भागच ओळखता येत होता. तर कझाकीस्तानमध्ये (Kazakhstan) देखील झालेल्या विमान अपघातात मागील भागात बसलेल्या लोकांचे बचाव व्हिडिओ समोर आले होते. याचा अर्थ असा देखील लावला जाऊ शकतो की, विमानाच्या इतर भागांच्या तुलनेत मागील भाग अधिक सुरक्षित असते.
मागील सीट सुरक्षित का ?
अनेक विमान अपघातात विमानांच्या पुढच्या भागावर जास्त परिणाम होतो. अपघातादरम्यान बहुतेक मागचा भाग टक्करातून वाचतो.क्रू मेंबर्स देखील विमानाच्या मागील भागात राहतात. पण असं नाही की मागील सीट सुरक्षित असते पुढची सीट देखील सुरक्षित राहते. विमानात सर्वात असुरक्षित जागा मधल्या जागा मानल्या जातात.
विमानात कोणत्या जागा किती सुरक्षित विमानाच्या मधल्या जागांवर विमानाचे पंख असतात, जे इंधनाने भरलेले असतात ज्यामुळे अपघाताच्या वेळी या भागात सर्वात आधी आग लागते. त्यामुळे मधल्या सीट सर्वात असुरक्षित मानल्या जातात.
Ahmedabad Plane Crash : मदत करा, पंतप्रधान मोदींचे निर्देश, अमित शाह गुजरातला रवाना
टाइम मासिकाच्या एका अहवालानुसार, गेल्या 35 वर्षातील विमान अपघातांच्या यादीवर विश्वास ठेवला तर मागच्या जागांवर मृत्यूचा धोका फक्त 28 टक्के आहे. तर उर्वरित जागांवर हा धोका सुमारे 44 टक्के आहे.