Download App

चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे…आमचं सरकार आलं की परतफेड होणारच

Amol Mitkari : राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका टिप्पणी करत असतात. यातच आज ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख फडणवीसांच्या घराकडे जल संघर्ष यात्रा घेऊन जात असताना त्यांना पोलिसांनी रोखले व ताब्यात घेतले. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार अस्तित्वात असल्यापासून लोकशाही संपली अशी टीका मिटकरी यांनी केली आहे. चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे असतात. आमचं सरकार सत्तेत आलं की याची परतफेड नक्की करू अशा शब्दात मिटकरी यांनी फडणवीसांना इशारा दिला आहे/

आमदार मिटकरी यांनी पुढे बोलताना म्हणाले की, जेव्हापासून शिंदे फडणवीस सरकार हे अस्तित्वात आले तेव्हापासून लोकशाही संपली आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला आहे. याच जीवंत उदाहरण म्हणजे आज अकोला ते नागपूर पर्यंत पाण्यासाठी संघर्ष यात्रा काढणारे नितीन देशमुख यांना ज्या पद्धतीने पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केली हे होय.

देशमुख हे आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी चालले होते मात्र त्यांना रोखण्यात आले व त्यानं तातडीने ताब्यात घेण्यात आले. गृहमंत्र्यांच्या दडपशाहीखाली पोलीस प्रशासन देशमुख यांना बेकायदेशीर ताब्यात घेतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करतात. त्यांच्या जीवाला धोका उत्पन्न अशी वागणूक देतात. अशा शब्दात मिटकरी यांनी थेट राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

प्राजक्ता माळीच्या फोटो पोझ पाहून चाहते भडकले

शिवसैनिकांना अमानुष वागणूक दिली जात आहे. मात्र चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे असतात. म्हणून एकदा का आमचे महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले की तुमच्या या कृत्यांची परतफेड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशाराच आमदार अमोल मिटकरी यांना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

Tags

follow us