Download App

संजय राऊत जेलमधून ‘सामना’साठी अग्रलेख लिहायचे, देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट

संजय राऊतांनी जेलमध्ये व्यवस्थित यंत्रणा लावली होती, ते जेलमधूनच सामनाचे अग्रलेख लिहायचे, असा गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केला.

  • Written By: Last Updated:

Anil Deshmukh : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) जेलमध्ये असतानाही सामनामध्ये त्यांचे अग्रलेख प्रकाशित होतच असतं. दरम्यान, राऊत सामनासाठी अग्रलेख कसे लिहायचे याबाबत आता माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) मोठा गौप्यस्फोट केला. राऊतांनी जेलमध्ये व्यवस्थित यंत्रणा लावली होती, ते जेलमधूनच सामनाचे अग्रलेख लिहायचे, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

‘पॉलिटेक्निक’साठी 30 जूनपर्यंत नोंदणीची मुदत, नवीन वेळापत्रक जाहीर : मंत्री चंद्रकांत पाटील 

देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रात द्वेषाचं राजकारण कधीच नव्हतं. बाळासाहेब ठाकरे, शरद पवार हे राजकीय विरोधक असले तरी त्यांनी सूडाचं राजकारण केलं नाही. सुप्रिया सुळे जेव्हा निवडणुकीला उभ्या राहिल्या, तेव्हा बाळासाहेबांनी त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही. गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शरद पवारांनी आपला उमेदवार दिला नाही. जांबुवंतराव धोटेंनी वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना अनेकदा त्यांच्यावर टीका केली. मात्र, वसंतरावांनी सत्तेचा दुरुपयोग केला नाही. नंतर वसंतरावांच्या मृत्यूनंतर जांबुवंतराव ढसाढसा रडले होते. आज सत्ताधारी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर विरोधकांना नेस्तानाबूत करण्यासाठी करतात. सत्ता मिळवण्यासाठी केला जात आहे. सरकार पाडण्यासाठी वापर केला जातो. स्वार्थासाठी पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे, अशी टीका देशमुखांनी केली.

मोठी बातमी, शाळेत स्फोटानंतर चेंगराचेंगरी, 29 मुलांचा मृत्यू, 260 जखमी 

सत्ताधाऱ्यांकडून बदला घेण्याचे काम सुरू
सोनिया गांधींपासून शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, केजरीवाल यांना समन्स पाठवले जातात. सत्ताधाऱ्यांकडून फक्त बदला घेण्याचे काम सध्या सुरू आहे. संजय राऊत जास्त बोलतात म्हणून खोट्या केसेस टाकून जेलमध्ये टाकलं. मी राज्याचे गृहमंत्री असतांना माझ्यावर अंबानींच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्यात आला. परमवीर सिंह आणि सचिन वाझेंनीच याचं प्लॅनिंग केल्याचं समोर आल्यानंतर आम्ही परमवीर यांची बदली केली. वाजेंना सस्पेंड केलं, परमवीर सिंह यांना सस्पेंड केल्यामुळे त्या दोघांनी माझ्यावर 100 कोटींचा आरोप केला. त्यामुळं विरोधकांनी मला लक्ष केलं. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर मी सांगितलं की, माझ्यावर आरोप केला त्यांना कोर्टात बोलवा, परमवीरला 6 समन्स पाठवले, पण ते माझ्याविरोधात पुरावा द्यायला आले नाहीत. देशातून फरार झाल्यानंतर मी केलेल्या आरोपाचे पुरावे नाहीत, असं अॅफिडिव्हेट सादर केलं.

देशमुख म्हणाले, 8 महिने मला बेल मिळवू दिली नाही, 5 न्यायधीश बदले गेले, 8 महिने सुनावणी झाली नाही. पण बेल भेटली नाही. मी सुप्रीम कोर्टात गेलो तेव्हा कपिल सिब्ब्ल यांनी बेल मिळवून दिली. मी 14 महिने जेलमध्ये होता. माझ्यावर 170 धाडी ईडी, आयटी आणि सीबीआयच्या धाडी टाकण्यात आल्या. महिला अधिकाऱ्यांनी कॅटबरी चॉकलेट देऊन माझ्या 6 वर्षाच्या नातीची चौकशी केली… मी समझोता केला असता तर मला चौकशीला सामोलं जावं लागलं नसतं, पण ते केलं नाही, असं देशमुख म्हणाले.

संजय राऊत, नवाब मलिकांना घरचा डबा गोता. माझी आणि राऊत साहेबांची भेट व्हायची. त्यांना घरचा डबा होता. मला घरच्या डब्याची परवानगी नव्हती. मी न्यायाधीशांचे नाव घेणार नाही, पण त्यांनी मला सांगितले की महात्मा गांधी तुरुंगातला डबा खात होते. मग अनिल देशमुखांना घरचा डबा कसा, असं हे न्यायाधीश म्हणाल्याचं देशमुखांनी सांगितलं.

ते म्हणाले, मी जेव्हा जेव्हा संजय राऊतांना भेटायला जायचो, तेव्हा ते काहीतरी लिहित बसायचे. मी बोलायचो काय लिहिताय, ते मला म्हणायचे उद्याचा सामना वाचा… ते अग्रलेख असायचे. मला मथळा वाचून दाखवाये. दुसऱ्या दविशी सामनात अग्रलेख जसाच्या तसा… आतमध्ये त्यांनी व्यवस्थित यंत्रणा लावली होती, असा गौप्यस्पोटही राऊतांनी केला. संजय राऊत यांच्या आग्रहावरून मी पुस्तक लिहायला घेतलं. संजय राऊतांच्या आग्रहाखातर मी लेखक झालो, अशी माहिती देशमुखांनी दिली.

follow us