Download App

लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याला प्राधान्य; जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणार

आपण लोकांचे प्रश्न समजून घेण, लोकांची प्रश्न सोडवण याला प्राधान्य देणार आहोत. आपण निवडून द्या ही अपेक्षा असं सुनेत्रा पवार प्रचारात म्हणाल्या.

Image Credit: letsupp

Sunetra Pawar : माझ्या सामाजिक कार्याची सुरुवातच मी काटेवाडी गावातून केली आहे. त्यामुळे मला गावापासून शहरापर्यंतच्या प्रश्नांची जाण आहे. या प्रश्नांची सोडवणूक करणं ही माझी जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव ठेवूनच मी काम करत राहीन अशी ग्वाही बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दिली.

 

अधिकाधिक प्रश्नांची सोडवणूक करणार

सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी हा अजितदादांचा आग्रह असतो. त्यांच्या कामाचा आवाका आणि पद्धत ही संपूर्ण महाराष्ट्राला अवगत आहे. त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास हाच मुद्दा घेवून मी ही निवडणूक लढवत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक प्रश्नांची सोडवणूक करण्यावर आपला भर असेल असेही सुनेत्रा पवार यांनी यावेळी नमूद केले.

 

तुम्ही संसदेत पाठवाल अशी अपेक्षा

लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीची वज्रमूठ घट झाल्याचं आपण पाहतो. ही एकजूट कायम ठेवून सर्वांनी आपल्या भागातून घड्याळाला अधिकाधिक मतदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी केलं. आपल्या उज्वल भवितव्यासाठी घड्याळाला अधिकाधिक मतदान करुन आपल्या हक्काच्या व्यक्तीला खासदार म्हणून तुम्ही संसदेत पाठवाल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी नागरीकांच्या अडचणी समजून घेवून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या.

 

या भागात दिल्या भेटी

सुनेत्रा पवार यांनी आज पुरंदर-हवेली मतदारसंघातील वडकी, देवाची उरुळी, हांडेवाडी, होळकरवाडी, अवताडेवाडी, वडाचीवाडी, उंड्री, पिसोळी, येवलेवाडी आदी भागांचा दौरा केला. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, जालिंदर कामठे, मोनिका हरगुडे, गणेश ढोरे, संदिप हरपळे, स्नेहल दगडे, स्वाती ठोंबरे, प्रशांत मोडक, प्रशांत भाडळे, आकाश बहुले, राहुल चोरघडे, प्रजित हरपळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

follow us

वेब स्टोरीज