Download App

‘…भरतशेठला मंत्री करायला सांगा’; भरत गोगावले यांनी व्यक्त केली खदखद

Bharat Gogavle : महादेवाला नमस्कार सांगून भरतशेठला मंत्री करायला सांगा, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले(Bharat Gogavle)यांनी वेगळ्या अंदाजात आपली खदखद व्यक्त केला आहे. दरम्यान, भरत गोगावले पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी भरत गोगावले यांनी आपली खदखद व्यक्त केली असल्याचं पाहायला मिळालं आहे.

रेवंथ रेड्डीच होणार तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री; खर्गेंकडून शिक्कामोर्तब, आजच शपथविधी

पुढे बोलताना ते म्हणाले, जसं आम्ही शिल्प आणण्यासाठी पायरी चढत चढत मंत्रालयापर्यंत गेलो आहोत. त्याप्रमाणे आपल्या परिसराचं नाव नाव बदलण्यासाठी तसं जावं लागणार आहे. त्याची सुरुवात आम्ही केली असून महादेववाडी नामांतर करायचं आहे. करायचं ना महादेव वाडी…हा..हा.. तर मग महादेवाला नमस्कार सांगा अन् भरतशेठला मंत्री करा, असं भरत गोगावले त्यांच्या शैलीत म्हणाले आहेत.

पक्षाकडून साईड लाईन झाल्यानंतरही मध्यप्रदेशात बाजीगर ठरले मामांजी; असा जिंकला गड

तसेच आपले मुख्यमंत्री मंत्रिमंडळात आम्हीच आहोत असं समजा, असंही ते जनतेला संबोधित करताना म्हणाले आहेत. दरम्यान, दीड वर्षांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली आणि ठाकरे सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. सुरूवातीला फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारभार पहात होते. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यात भरत गोगावलेंना डावलण्यात आलं. त्यानंतर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला आणि त्यांना ९ मंत्रिपदं मिळाली. याही वेळी गोगावलेंची संधी हुकली. त्यामुळं गोगावलेंवर अन्याय झाल्याचं बोलल्या जातं. दरम्यान, यावर आता गोगावलेंनी भाष्य केलं.

Telangana Election : तेलंगणात विद्यमान अन् भावी मुख्यमंत्र्यांना पराभूत करणारा जायंट किलर कोण?

मी रायगडाच्या पायथ्याशी राहणारा मावळा आहे. शिवरायांच्या विचारांनी चालणारा कार्यकर्ता आहे. आपल्याला ठाऊक आहे की, तानाजी मालुसरेंनी इतिहास घडवला. आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं असं त्यांनी ठरवलं होतं. मुलाचं लग्न आठ दिवसांवर आलं होतं, तरीही त्यांनी आधी आपल्या राजाचा विचार केला आणि लढाईवर गेले. लाखो मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे. त्याप्रमाणे आम्हाला जाणीव झाली की, एकनाथ शिंदे अडचणीत आले तर आमच्या आमदाराकीचा काय उपयोग? अशा काही घटना घडतात की, त्या अजरामर होतात. राजकारणात आमची नोंद होऊ शकते, असं ते म्हणाले.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रिपद मिळाल्यानं अन्याय झाला का? सरकारमध्ये राष्ट्रवादीला घेण्याची काय गरज होती?असा प्रश्न विचारल्यावर गोगावले म्हणाले की, हे आमचे आणि भाजप आमदारांचे मत होते. पण, भविष्यातील राजकारणासाठी टाकलेल्या डावातून हे सर्व घडलं आहे. हे आम्ही समजून घेतलं आहे. अजून १४ मंत्रिपद आहेत. यासाठी देवीला साकडं घातलं आहे, असं गोगावले म्हणाले. त्यामुळं आगामी मंत्रिमंडळ विस्तारात भरत गोगावलेंना मंत्रिपद मिळतं का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us