Download App

‘हल्ला करण्यासाठी माझी सुरक्षा काढण्यात आली’; Bhaskar Jadhav यांचा Fadanvis यांच्यावर गंभीर आरोप

मुंबई : खासदार श्रीकांत शिंदे मला जीवे मारण्याचा कट रचत असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला. याच पार्श्वभूमीवर, संजय राऊतांनी (Sanjay Raut) राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पत्रही लिहिलं. मात्र, हे पत्र गांभीर्याने न घेता उलट फडणवीसांनी राऊतांवरच टीका केली. ह्याच पार्श्वभूमीवर, प्रतिक्रिया देताना भास्कर जाधवांनी ( Bhaskar Jadhav) फडणवीसांवर गंभीर आरोप, टीका केली. हल्ला करण्यासाठी माझी सुरक्षा काढण्यात आली होती; असा आरोप भास्कर जाधवांनी केला. तसेच, आमची घरं जाळून तुम्हाला समाधान मिळेल काय? असा सवालही केला. फडणवीस हे खोटं बोलतात असं म्हणत भास्कर जाधवांनी जोरदार घणाघात केला आहे.

हल्ल्यापूर्वी पोलिस संरक्षण काढले

भास्कर जाधव म्हणाले, रात्री दोन ते अडीचदरम्यान चिपळूणमधील माझ्या घरावर हल्ला करून हल्लेखोर पळून गेले. त्यापूर्वी रात्री 11 वाजताच माझ्या घरावरील पोलिस संरक्षण कमी करण्यात आले. त्यानंतर मुंबईत मला असलेली पोलिसांची सुरक्षाही कमी करण्यात आली. केवळ पोलिसांच्या पातळीवर एवढा मोठा निर्णय होऊ शकत नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर यापूर्वी मी कधीही संशय घेतला नाही. मात्र, माझ्या घरावर झालेल्या हल्ल्यामध्ये निश्चितपणे पोलिसांचा हात आहे. असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.

तुम्हाला काय वाटत ? रामदास कदमांसारखा दुसरा बेवडा कोण बोलू शकतो का ? ‘नेत तू सीएम…नेत तू सीएम…त्याला तेवढीच अक्कल आहे, असे म्हणत जोरदार हल्लाबोल करत आहेत. संजय राऊतांच्या पत्रावरून देखील त्यांनी म्हणाले की, संजय राऊत यांनी नुसते बोले नाही तर त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना देखील लिहिले आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांनी पात्र लिहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने या पत्राची गंभीर दखल घेऊन या पात्राची चौकशी करायला हवी होती, परंतु त्यांनी त्या पात्राची टिंगलटवाळी, चेष्टा केली आहे, असा घणाघात त्यांनी यावेळी केला आहे.

Tags

follow us