Download App

…अन्यथा देवेंद्र फडणवीस जेलमध्ये गेले असते, चंद्रकांत पाटील असे का म्हणाले…

  • Written By: Last Updated:

Chandrakant Patil And Devendra Fadanvis : भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात जर शिवसेना फुटली नसती तर महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीस यांना जेलमध्ये टाकलं असत. म्हणून शिवसेना फोडली आणि महाविकास आघाडीचं सरकार पाडलं आणि आमचं सरकार पाडलं. चंद्रकांत पाटील झी 24 तास च्या मुलाखतीत बोलत होते.

आमचं सरकार आलं म्हणून आता आमच्या पक्षाला फायदा झाला हे निश्चित आहे. प्रत्येकजण फायद्यासाठीच राजकारण करत असतो. असे पाटील यावेळी म्हणाले. हे महाविकास आघाडीचं सरकार पाडलं नसत तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना जेलमध्ये टाकलं असत. सोबत त्यांच्या आगोदर आम्हाला देखील जेलमध्ये टाकलं असत यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. खोटे नाटे आरोप केले असते कुठल्याना कुठल्याना आरोपात गुंतवलं असत आणि जेलमध्ये टाकलं असत.

Nana Patole म्हणतात… हिंदूंचा ठेका काय फक्त भाजपला दिलाय का ? आम्ही पण अयोध्याला… 

पुढे बोलताना पाटील म्हणाले महाविकास आघाडीने आपल्या सरकारच्या काळात आमच्या अनेक नेत्यांना त्रास दिला. आणि जेलमध्ये देखील टाकत यामध्ये नवनीत राणा असतील, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना देखील यांनी सोडलं नाही. हे लक्षात आल्यामुळे शिवसेनेला फोडून हे सरकार पाडलं आणि आमचं सरकार आणलं. आता हे शिंदे आणि आमचं सरकार असल्यामुळे याचा फायदा आम्हाला मागणी काळात नक्की होईल.

…तर हीच खरी आमची संपत्ती; शिंदे गटाचे स्पष्टीकरण

हे सरकार नेमकं शिंदेंचं की तुमचं यावर बोलताना पाटील म्हणतात हे सरकार आमच्या दोन्ही पक्षाचं आहे. परंतु आमचे आमदार जास्त असल्यामुळे हे साकार भारतीय जनता पार्टीचा अजेंडा पुढे नेहणार, देवेंद्र फडणवीस यांचं धोरण राबवणार हे सरकार आहे.

Tags

follow us