Download App

समृद्धीची श्वेतपत्रिका काढा, 15 हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल; हर्षवर्धन सपकाळांचं खुलं चॅलेंज

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची श्वेतपत्रिका काढा, 15 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड होणार असल्याचं खुलं चॅलेंजच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलंय.

Harshwardhan Sapkal : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची श्वेतपत्रिका काढा, 15 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड होणार असल्याचं खुलं चॅलेंजच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी दिलंय. दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं. त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी निशाणा साधलायं.

अफवा उडाली, बॅरिगेट तुटले अन्… संभाजीनगरच्या तरुणाने सांगितला अंगावर काटा आणणारा थरार

पुढे बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची वाहवा करून घेत आहे. परंतु हा महामार्ग भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. 55 हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग शेवटी 70 हजार कोटी रुपयांवर गेला. 15 हजार कोटी रुपयांनी प्रकल्पाचा खर्च फुगवला यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर समृद्धी महामार्ग प्रकल्पावर एक श्वेतपत्रिका काढावी, असं खुलं चॅलेंज हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलंय.

कारखानदार, चोर, दरोडेखोर म्हणूनच अर्थ खात… अन् अजित पवारांवर बोलताना हाकेंची जीभ घसरली

तसेच घोडबंदर भाईंदर बोगदा व उन्नत मार्ग प्रकल्पात 3 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. सुप्रीम कोर्टाचा हातोडा पडल्याने नाईलाजाने या प्रकल्पाची निविदा रद्द करत असल्याचे सरकारला जाहीर करावे लागले. घोडबंदर भाईंदर प्रकल्पाप्रमाणे समृद्धी महामार्ग प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्या बगलबच्च्यांनी यातून मोठा मलिदा खाल्ला असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलायं.

समृद्धीच्या भ्रष्ट पैशातूनच 50 खोके एकदम ओके चा कार्यक्रम झाला. समृद्धी महामार्ग हा भ्रष्टाचाराचा महामार्ग आहे. या महामार्गासाठी किती पैसे लागले, कोणत्या पुलाला किती खर्च आला, एका किलोमीटरला किती खर्च आला, शेतकऱ्यांना भूसंपादनाचे किती पैसे दिले, कंत्राटदारांना किती दिले, झाडे लावण्यास किती खर्च आला आणि टोलमधून किती वसुली सुरु आहे याचा संपूर्ण लेखाजोखा श्वेतपत्रिकेतून मांडावा, असंही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय.

follow us