Download App

हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी; शिंदेसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं…

हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी, या शब्दांत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांना डिवचलंय.

Shivsena : शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांचे दोन वेगवेगळे गट निर्माण झाले आहेत. दोन गटात शिवसेना दुभंगल्याने दोन्ही गटांत चुरस असल्याचं पाहायला मिळतं. अशातच आता शिवसेनेचा वर्धापन दिन येत्या 19 जून रोजी मुंबईतील वरळीत तपार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांना डिवचण्यात आल्याचं दिसून येत आहे. हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी, असं कॅप्शन देत शिवसेनेने फेसबुक पोस्ट शेअर केलीयं. यामध्ये एकनाथ शिंदे हातात भगवा झेंडा चालताना दिसत आहेत.

या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपली भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केली असून हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी, असे सांगत वाघासोबत चालणारे एकनाथ शिंदे यांचे व्यंगचित्र आपल्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला विधानसभा निडवणुकीत भरघोस मते मिळाली आहेत. तर उद्धव ठाकरे गटाला अवघ्या काही जागांवर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे व्यंगचित्रांच्या माध्यमातून ठाकरे गटाला डिवचण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचा वर्धापन दिन गुरूवारी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त वरळीतील एनएससीआय डोम येथे एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार, खासदार, पाधिकारी आणि शिवसैनिकांना संबोधीत करतील. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या वर्धापन दिनाला महत्वाचे मानले जाते. यावेळी एकनाथ शिंदे पक्षाची भूमिका, पक्षाचे स्थानिक पदाधिकारी घोषित करण्याची चर्चा रंगली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी भाजपचा मेगा मास्टरप्लॅन!‘स्पॉट टार्गेटिंग’ मधून खेचून आणणार विजय?

मात्र, त्याचवेळी वर्धापन दिनानिमित्त अस्सल ठाकरे शैलीत शिवसेनेच्यावतीने व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. हिंदुत्व आहे गाठीशी, महाराष्ट्र उभा पाठीशी, असा मजकूर त्यावर नमूद आहे. सोबतच शिवसेनेचा वाघ आणि सोबतच चालणारे एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर भगवा ध्वज तसेच पाठीशी महाराष्ट्र दाखवण्यात आला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्राची जनता शिवसेनेच्या पाठीशी उभी असल्याचे सिद्ध झाले आहे, असे एकनाथ शिंदे वारंवार आपल्या भाषणात सांगत असतात. तोच आशय यात देण्यात आला आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाने हिंदुत्व सोडले असल्याचा आरोपही होतोयं. हिंदुत्वाचा नारा एकनाथ शिंदे यांनी यापुढेही कायम राहील, असाच संदेश या व्यंगचित्राच्या माध्यमातून दिल्याची चर्चा रंगली आहे.

follow us