फोन केला, मदत मागितली अन् एकनाथ शिंदे थेट श्रीनगरात पोहोचले; पर्यटकांना मिळाला दिलासा

Jammu Kashmir : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी रात्री उशीरा श्रीनगर येथे (Srinagar) पोहोचले. तिथे पोहोचताच त्यांनी विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातील पर्यटकांची भेट घेतली. यावेळी त्यांची विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर मुंबईला जाण्यासाठी लागेल ती सर्व (Jammu Kashmir Attack) मदत केली जाईल असे सांगितले. थेट उपमुख्यमंत्री काश्मीरमध्ये येऊन भेट घेतात. सुरक्षिततेचं आश्वासन देतात ही भावना पर्यटकांच्या मनात घर करून गेली. कठीण प्रसंगातही त्यांच्या चेहऱ्यावर विश्वास दिसला.
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरममध्ये फिरायला (Pahalgam Terror Attack) गेलेले राज्यातील अनेक पर्यटक तिथेच अडकून पडले होते. यातील काही पर्यटकांनी फोनवरून शिंदे यांच्याशी संवाद साधून मदतीची मागणी केली होती. यानंतर कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्यासह शिवसेनेच्या मदत पथकाला जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या मराठी नागरिकांच्या मदतीसाठी शिंदे यांनी पाठवले होते.
या मदत कार्याला वेग देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही स्वतःही काश्मीरला रवाना झाले. काल श्रीनगर येथे पोहोचताच त्यांनी पर्यटकांची भेट घेतली. यावेळी शिंदे साहेबांच्या रूपाने आपल्यासाठी आपला हक्काचा माणूस मदतीला धावून आल्याची भावना अनेक पर्यटकांनी व्यक्त केली.
पहलगाम दहशतवादी हल्ला अन् भारताने तोडलेला सिंधू पाणी करार काय? जाणून घ्या सर्वकाही
राज्यातील नागरिकांना सुखरूप परत नेण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी विशेष विमानांची सोय करण्यात आलेली आहे. त्यातील पहिले विमान काल रात्री रवाना झाले. त्यातून 65 लोक मुंबईला परतणार आहेत. तर आज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी अजून तीन विमाने अजून काही पर्यटकांना घेऊन मुंबईकडे झेपावतील असे शिंदे यांनी सांगितले. इथे अडकलेल्या पर्यटकांना भेटून आपण त्याना दिलासा दिला असून सर्वांना सुखरूपपणे आपल्या राज्यात नक्की नेण्यात येईल असेही सांगितले आहे. त्यामुळे पर्यटकांना आता चिंता करण्याची काळजी नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
पहलगाममध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू
जम्मू काश्मीरातील पहलगाम येथे काल (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात या अतिरेक्यांनी हिंदू धर्मियांना टार्गेट केलं. त्यांची धार्मिक ओळख आणि नावं विचारून (Jammu Kashmir Attack) त्यांना गोळ्या घातल्या. भारताचं स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं पहलगाम रक्तरंजित झालं. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला मोठा दणका! 5 महत्वाचे निर्णय, फक्त 48 तासांची मुदत