Download App

Jayant Patil: ‘रेशनकार्डच रद्द करुन धान्य न देण्याच्या धमक्या’; जयंत पाटलांचे गंभीर आरोप

Jayant Patil On Eknath Shinde: मुख्यमंत्री महोदय हे काय सुरू आहे ? असा प्रश्न करतानाच महाराष्ट्राने अशी हुकूमशाही कधी देखील बघितली नाही. अशा या हुकूमशाहीला महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय शांत राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत दिला आहे.

‘शासन आपल्या दारी’ या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्यासाठी लोकांना धमकीवजा पत्र पाठवले जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी सरकारवर केला आहे. शासन आपल्या दारी या मोहिमेकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगावामध्ये असणार आहेत, या कार्यक्रमासाठी जास्त प्रमाणात गर्दी जमवावी, या हेतूने शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात असल्याचे यावेळी सांगितले आहे.

धर्मग्रंथांना तरी सोडा; सेन्सॉर बोर्ड काय करतं? न्यायालयाने आदिपुरुषच्या निर्मात्यांसह सेन्सॉर बोर्डलाही फटकारलं

रेशनकार्डधारकांनी सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांचे रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहे, तसेच पुढील ४ महिने धान्य पुरवले जाणार नाही, असा धमकीचे पत्र पाठवण्यात आले आहे. जनतेला कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी सरकारच्या या धमकी पत्रावर जयंत पाटील यांनी गंभीर आरोप केले आहेत.

तसेच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सुरु असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजनांच्या लाभार्थ्यांना जबरदस्ती करण्यात येत आहे. रेशन दुकानदाराना देखील रेशनकार्ड धारकांचे ४ महिन्यांचे धान्य बंद करण्याची धमकी देण्यात आली होती. त्याविषयीचे मॅसेज लाभार्थ्यांना प्राप्त झाल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.

Tags

follow us