Download App

राऊतांविरोधात गुन्हा दाखल,शिंदे-फडणवीसांबद्दलची बेताल वक्तव्य भोवणार

  • Written By: Last Updated:

Kiran Pavaskar On Sanjay Raut : खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताने अनेक भाविकांचा मृत्यू झाला. दरम्यान, या मृतांचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या पोस्टमार्टम रिपोर्टनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यावर टीकास्त्र डागलं होतं. श्रीसेवकांच्या पोटात 7 ते 8 तास अन्नपाणी नव्हतं, असं या रिपोर्टमध्ये समोर आलं. त्यानंतर राऊतांनी श्रीसेवक अन्नपाण्यावाचून तडफडून मेले, असं सांगत या दुर्घटनेतील किमान आकडा हा 50 तर कमाल आकडा हा 75 इतका असल्याचं सांगितलं. राऊतांच्या या वक्तव्यारून शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर (Kiran Pavaskar) यांनी राऊतांवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह सर्वांनी दुःख व्यक्त केलं. लागणारी मदतही केली. मात्र, तरी आज संजय राऊतांनी या दुर्घटनेत 50 हून अधिक हून अधिक श्रीसदस्य चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडले, असं सांगितलं. हे वक्तव्य त्यांनी कुठल्या आधारावर केलं यामागे कुठलंही अधिकृत रेकाॅर्ड नाही, केवळ मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची बदनामी करणं हा राऊतांचा उद्देश आहे. कुठे राजकारण करायचं हे न कळालेली व्यक्ती, चुकीचे आरोप करून गलिच्छ नीच पणाचं राजकारण संजय राऊत करत आहेत. असा आरोप यावेळी किरण पावसकर यांनी केला.

माझ्याशी खुलेआम चर्चा करा, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पुन्हा चॅलेंज…

संजय राऊत हे वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांच्या बाबत जे बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांच्या विरोधात किरण पावसकर, संजय शिरसाट, भारत गोगावले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना किरण पावसकर यांनी दिली. कारण, लोकशाहीत बोलण्याचा अधिकार असला तरी चिड निर्माण व्हावी, उद्रेक व्हावा यासाठी कुठलेही विधानं करणं, हे योग्य नाही, असं ते म्हणाले.

Twitter ने सर्वांनाच ठणकावले, राहुल गांधी ते विराट, अमिताभ बच्चन ते रोनाल्डो अनेकांच्या ब्लू टीक गायब

धर्माधिकारी यांचा भक्तगण किती आहे, त्यांच्या भावना काय आहेत. हे माहीत असतानाही विरोधकांनी खारघर घटनेचं फक्त राजकारण केलं. वज्रमूठ सारखे ट्रकमध्ये भरून आणलेले हे लोक नव्हते. विरोधक सरकारवर खापर फोडण्यासाठी सरकारचं नाव घेतात. पैसे देऊन तोंड बंद केलं, अशी टीका विरोधक करत आहेत. असं बोलणं गलिच्छ आहे, हे शब्द वारंवार वापरणार असं राऊत म्हणाले. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वाबद्दल हे असंच बोलतात, त्याला कुठेकरी चाप बसला पाहिजे. यासाठी आम्ही जबाब नोंदवलेत, असं पावस्कर यांनी सांगिलतं.

 

Tags

follow us