Download App

बंद दाराआड चर्चा! अजितदादा म्हणाले, कुटुंब म्हणून पवारसाहेब आणि आम्ही एकत्र…

घरातील कार्यक्रम असेल तर आम्ही एकत्र येतो. विचारधारा जरा वेगवेगळी आहे, पण कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. - अजित पवार

Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे या चर्चा सुरु असतानाच शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यामध्ये बंद दाराआड बैठक झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. यावर आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केलं. तसेचं कुटुंब म्हणून पवारसाहेब आणि आम्ही एकत्रच आहोत, असं ते म्हणाले.

कधी ऊन, कधी पाऊस… बदलत्या हवामानात मुलांची काळजी घेण्यासाठी महत्वाच्या टिप्स 

अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. कालच्या बैठकीबद्दल विचारले असता अजितदादा म्हणाले, बंद दाऱाआड चर्चा झाल्याची बातमी तुमची आहे. कालची मिटींग साखरचे उत्पादन वाढवण्यासाठी एआयच्या वापराबाबत होती. त्या मिटींगमध्ये चर्चा झाली. आणि तिथं अनेक लोक होते. मी आणइ शरद पवार साहेबच नव्हतो. त्या मिटींगला बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, जयंत पाटील, डॉ. इंद्रजित मोहित पाटील, साखर आयुक्त होते. तिथं पवार साहेब होते, मी होतो. हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे पाटीलही हजर होते. आता पुन्हा 9 ताऱखेला आमची व्हिएसआयला मिटींग आहे, असं अजितदादा म्हणाले.

आठ दिवसांत कळेल उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोण राहतय; मंत्री गिरीश महाजन असं का म्हणाले? 

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, असा सवाल केला असता अजितदादा म्हणाले की, माझ्या मुलाच्या साखरपुड्याला ते सर्व आले होत. घरातील कार्यक्रम असेल तर आम्ही एकत्र येतो. विचारधारा जरा वेगवेगळी आहे, पण कुटुंब म्हणून आम्ही एकत्र आहोत. कुटुंब म्हणून आम्ही सुख-दु:खात सोबत आहोत, असं ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या सत्तेत आहे. तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गट विरोधी पक्षांसोबत आहे. दरम्यान, आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर आता हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असा चर्चा रंगल्या आहेत. येत्या १० जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा २६ वा वर्धापन दिन आहे. त्याआधी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us