Download App

उद्धव ठाकरेंबरोबरील बैठकीत शिजलं काय ? ; पवार म्हणाले, काही मुद्द्यांवर मतं वेगळी..

Maharashtra Politics : ‘आमच्यात काही मुद्द्यांवर वेगळी मते असली तरी महाविकास आघाडीत जे पक्ष आहेत त्या सर्वांनी एकमताने आणि एकविचाराने काम करावे अशी चर्चा झाली आहे. आगामी काळात काही कार्यक्रम आखले असून त्यात सर्वांनी सहभागी व्हावे अशी चर्चा यावेळी झाली’, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली.

पवार आज त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भेट घेतल्याच्या मुद्द्यावरही पत्रकारांनी त्यांना विचारले. या प्रश्नावरही त्यांनी मत व्यक्त केले.

बच्चू कडूंच्या मनधरणीसाठी मुख्यमंत्री मैदानात, नाराजी दूर करण्यासाठी देणार ‘हे’ खास गिफ्ट

या सव्वा तास चाललेल्या बैठकीत काय चर्चा झाली हे पवार यांनी सांगितले. ‘आमच्यात काही मुद्द्यांवर वेगळी मते असली तरी महाविकास आघाडीत जे पक्ष आहेत त्या सर्वांनी एकमताने आणि एकविचाराने काम करावे अशी चर्चा झाली आहे. आगामी काळात काही कार्यक्रम आखले असून त्यात सर्वांनी सहभागी व्हावे अशी चर्चा यावेळी झाली’, असे ते म्हणाले.

गौतम अदानींच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे समोर आले होते. त्यामुळे महाविकास टिकणार की नाही अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. आघाडी टिकणार नाही असा दावा भाजपकडूनही केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये बराच वेळ चर्चा झाली.

काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल उद्धव ठाकरेंना भेटणार…

सावरकर, अदानी मुद्द्यांवर महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांची मते वेगळी असली तरी समन्वय राखून आगामी निवडणुकांना सामोरे जावे असे ठरले. ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. त्यानंतर आता वंचितला आघाडीत घ्यायचे की नाही यावर मात्र सहमती होऊ शकली नाही.

Tags

follow us