Download App

Manoj jarange : ‘पोलिसांनी वाहनं अडवली तर गृहमंत्र्यांच्या घरी जाऊन बसू’; जरांगेंचा रोखठोक इशारा

Manoj jarange : मराठा आरक्षणासाठी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आरपारच्या भूमिकेत दिसत आहेत. काल त्यांनी मुंबईकडे जाण्यासाठी कोणता मार्ग असेल याची माहिती दिली. एकदा मुंबईत पोहोचलो की आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. पोलिसांनी मराठा आंदोलकांची वाहनं अडवली तर देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा दिला.

Manoj Jarange : ठरलं तर! नगर-पुणे मार्गे मुंबईत धडकणार; जरांगे पाटलांनी ‘रुट’ केला जाहीर

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 20 जानेवारी रोजी लाखो मराठा समाजबांधव आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. नगर पुणेमार्गे मुंबईत दाखल होणार आहेत. येथील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले जाणार आहे. या आंदोलनाची माहिती काल प्रसारमाध्यमांना दिली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी थेट गृहमंत्री फडणवीसांना इशारा दिला आहे. मराठा बांधवांना राहण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी वस्तू घेऊन जाव्या लागणार आहेत. त्यामुळे सगळी वाहनं बाहेर काढावीत. कुणाच्याही वाहनांना धक्का लागणार नाही. गृहमंत्री फडणवीस आहेत. पोलिसांनी वाहनं अडविण्याचा प्रयत्न केला तर गृहमंत्र्यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरी जाऊन बसू, असा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील म्हणाले होते की, येत्या 20 जानेवारी रोजी आंतरवाली सराटी येथून मराठा समाजबांधव मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. या आंदोलनाची सुरुवात आंतरवाली सराटी येथून होणार आहे. लाखो समाजबांधव पायी प्रवास करून मुंबईत येणार आहेत. या आंदोलनात समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. आपल्या मुलांना आरक्षण मिळवून देण्याची ही शेवटची संधी आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गांवर गावकऱ्यांनी समाजबांधवांना सहकार्य करावं. त्यांच्या भोजनाची आणि पाण्याची व्यवस्था करावी, असेही आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केले.

Manoj Jarange : अजून किती दिवस आम्हाला वेड्यात काढणार? मनोज जरांगेंचा अजितदादांना सवाल

आपण ठरल्याप्रमाणे 20 जानेवारी रोजी मुंबईला निघणार आहोत आणि आरक्षण घेऊनच माघारी फिरणार आहोत. तेव्हा आंदोलनात कुणीही बाहेरचं शिरलं तर त्याला तत्काळ पोलिसांच्या हवाली करा. आपले सण उत्सव नंतर साजरे करा. सध्या मराठा आरक्षण हे एकच ध्येय असलं पाहिजे. एकदा घराबाहेर पडलं की आरक्षण घेऊनच माघारी येऊ. आंदोलनात कुणीही उद्रेक करू नका. आंदोलन शांततेत होईल याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले होते.

follow us