Sanjay Raut On Delhi Election 2025 Result : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल (Delhi Election 2025) आलाय. त्यामध्ये आम आदमी पार्टी अन् कॉंग्रेसचा पराभव झालाय. यावर आता राजकीय वर्तुळातून नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची (Sanjay Raut) प्रतिक्रिया समोर आलीय. काँग्रेस (Congress), आप (AAP) एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलीय.
सगळं मावळलेलं असताना तुम्ही शिवसेना…ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंच्या शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
संजय राऊत यांनी म्हटलंय की, राजकारणात संसदीय लोकशाहीत जय पराजय, हार-जीत होत असते. मात्र मागच्या दहा वर्षात भाजप सत्तेत आल्यापासून त्या संविधानिक पद्धतीत निवडणूक होत नाहीत. विजयासाठी साम, दाम, दंड, भेद वापरले जात आहे. मतदार यादीतील घोळ महाराष्ट्रप्रमाणे इतरही राज्यात आहेत. काँग्रेस, आप एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता, यातून शिकायला हवं असा इशारा देखील खासदार संजय राऊत यांनी दिलाय.
अहिल्यानगरमधील रनर्सच्या महाकुंभात धावले दोन हजार धावक, दिव्यांग अन् राजकीय व्यक्तींचाही सहभाग
अण्णा हजारेंवर बोलताना राऊत म्हणाले की, ते काय बोलतात याला अर्थ नाही. मोदींच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचार झाले, त्यावेळी ते होते कुठे? केजरीवाल यांचा पराभव झाला याचा आनंद अण्णांना झालाय. देश लुटला जातोय, एकाच उद्योगपतीच्या घशात सर्व घातलं जातंय. याने लोकशाही टिकेल का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. आम्ही खूर्चीसाठी लढत होतो, तर ते कशासाठी लढत होते? महाराष्ट्रातंल सरकार ही वेड्याची जत्रा असल्याची टीका त्यांनी केलीय.
मुख्यमंत्री पदाची खूर्ची गेल्यावर फडणवीसांचा तो चेहरा पाहिलाय. ज्यांची खूर्ची गेली, ते कसे रूसून बसत आहेत तेही पाहतोय. अमित शहांनी शब्द पाळला असता तर ही घडामोड झाली नसती
2019 ला आम्ही चर्चा केली असं ते म्हणत आहेत मग 2014 ला काय झालं होतं? भाजपने युती का तोडली? शिवसेना प्रमुख नाहीत, या आनंदात भाजपने निवडणूका लढवल्या, अशी टीका देखील राऊतांनी केलीय.
फडणवीस यांना विजयाचं हॅग ओव्हर झालंय. शिंदेंचं ऑपरेशन कधी अमित शहा करतील, हे त्यांना ही कळणार नाही. आरोपींना अटक होत नसेल तर फडणवीस म्हणतात कोणाला सोडणार नाही. मग आरोपीला अटक का होत नाही? बीडमध्ये जाऊन मुख्यमंत्री हारतुरे काय स्वीकारत आहेत. ही त्यांची मिलीभगत आहेत. जरांगे पाटील यांचे मुद्दे पाठीशी टाकण्यासाठी धस यांना पुढे आणलं जातं आहे का ? मुख्यमंत्री नेमकं कोणाला पाठीशी घालत आहेत? बीडची जनता मुर्खवाटली का? असे प्रश्न देखील राऊतांनी उपस्थित केलेय.