Download App

Narayan Rane यांची ‘फडतूस’ वादात उडी! उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राला कलंक…

Narayan Rane : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून ‘फडतूस’ शब्दावरून गदारोळ सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील रोशनी शिंदे प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘फडतूस’ म्हणून हिणवले आहे. त्यावरून भाजपचे मंत्री, आमदार हे उद्धव ठाकरे यांच्यावर अगदी तुटून पडले आहेत. या वादात आता केंद्रील मंत्री नारायण राणे यांनी उडी घेतली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती हल्ला करत उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्राला लागलेल्या कलंक आहे, अशा तिखट शब्दात हल्ला केला.

उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘फडतूस’ म्हणून हिणवले. त्या वादात उडी घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

नारायण राणे म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांना किमत आहे. नाही तर या उद्धवला विचारतो कोण, अशी परिस्थिती आहे. स्वत:च काही कर्तृत्व नाही. केवळ दुसऱ्याला कमी लेखने एवढंच काम तो माणूस करतो. स्वत:च्या घरातील लोकांना या माणसाने त्रास देऊन घराबाहेर काढले. एक माणूस याला चांगले म्हणत नाही.

Roshni Shinde : ठाकरे गटाच्या मोर्चाला अखेर ठाणे पोलिसांकडून परवानगी; पण ‘हे’ नियम पाळावे लागतील – Letsupp

कोरोना काळात घरकोंबड्यासारखं घरातून बाहेर पडला नाही. लोकं मरत होती. पण हा घडी घरातच बसला. कोणाला कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. कोण मेल, कोण जंगलं याला काही माहिती आहे का, केवळ लोकांना भडकावयाची कामे हा माणूस करत आहे. अरे लोकांना रस्त्यावर उतरावयाला सांगण्यापेक्षा तू स्वत: कधीतरी रस्त्यावर उतरण्याची हिमत दाखव. मातोश्रीच्या घरात सुद्धा हा एकटा फिरत नसेल, इतका घाबरट आहे. सतत कोणाला तरी घेऊन फिरतो आणि आम्हाला धमक्या देण्याची हिमत करताे. तु एकदा बाहेर ये आम्ही दाखवतो, असा थेट इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषदेत दिला.

(16) Omraje Nimbalkar & Kailas Patil : खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची ‘बदले की आग’ | – YouTube

Tags

follow us