Download App

Sanjay Kakade : …म्हणून धंगेकरांचा भाजपमध्ये प्रवेश झाला नाही; संजय काकडेंनी सोडलं मौन

  • Written By: Last Updated:

कसब्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाजपात येण्यास इच्छुक होते, अशा स्वरूपाच्या चर्चा सुरु होत्या. त्यावरही काकडे यांनी मौन सोडले ते म्हणाले धंगेकर आमच्या संपर्कात होते पण २०१७ मध्ये त्यांनी पक्षात प्रवेश करायची तयारी दाखवली होती, पण त्यावेळी  काही स्थानिक नेत्यांनी नकार दिल्याने त्यांच्या प्रवेश टळला. असा गौप्यस्फोट माजी खासदार संजय काकडे यांनी केला. लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी माजी खासदार संजय काकडे यांची मुलाखत घेतली.

या मुलाखतीमध्ये संजय काकडे यांनी कसबा पोटनिवडणूक,सध्याची राजकीय परिस्थिती आणि राजकीय भविष्य यावर रोखठोक मते व्यक्त केली. संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी येथे क्लिक करा : Sanjay Kakade: सातवी पास संजय काकडेंचा सत्ता दरबारात शिरकाव कसा….अनकट संजय काकडे

कसब्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाजपात येण्यास इच्छुक होते, अशा स्वरूपाच्या चर्चा सुरु होत्या. त्यावरही काकडे यांनी मौन सोडले ते म्हणाले धंगेकर आमच्या संपर्कात होते पण २०१७ मध्ये त्यांनी पक्षात प्रवेश करायची तयारी दाखवली होती, पण त्यावेळी  काही स्थानिक नेत्यांनी नकार दिल्याने त्यांच्या प्रवेश टळला. पण त्यांनतर पुणे महापालिकेत अपक्ष लढून त्यांनी थेट भाजप गटनेत्यांच्या पराभव केला.

पोटनिवडणुकीच्या वेळी पक्षश्रेष्ठीकडे रवींद्र धंगेकर यांच्याशी न बोलता हा उमेदवार आपल्याकडे असेल तर निवडून जिंकणं सोपं जाईल, असं  सांगितलं होतं पण पक्षाच्या सर्वेमध्ये हेमंत रासने निवडून येतील असं आल्यामुळे हि चर्चा थांबली असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा : Sanjay Kakade : कसब्याचा पराभव कोणामुळे? चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे

ब्राह्मण समाज नाराज होता?

कसाब पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाज नाराज असल्याचा चर्चा होत्या. पण तसं काही चित्र नव्हतं, असं मत काकडे यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की ब्राह्मण समाज नाराज असता तर आम्हाला ६३ हजार मते पडली नसती. काही प्रमाणात ब्राह्मण समाज नाराज होता, पण त्याचा विशेष काही फरक पडला नाही.

बापट स्वतःहून प्रचाराला आले

कसबा निवडणुकीत आजारी गिरीश बापट यांना प्रचाराला आणल्यामुळे भाजपवर टीका झाली. पण आम्ही बापट यांना प्रचाराला आणलं आम्ही आणलं नाही ते स्वतःहून आले. असं स्पष्टीकरण संजय काकडे यांनी दिलं. ते म्हणाले की गिरीश बापट यांनी १० निवडणुका पाहिल्या आहेत, म्हणजे ५० वर्ष त्यांनी राजकारण पाहिलं आहे. त्यातील ३० वर्षे त्यांनी सक्रिय राजकारण केलं आहे. त्यामुळे अचानक लागलेल्या निवडणुकामुळे ते स्वतःहून प्रचाराला आले.

पराभवात चूक कोणाची?

पराभव झाला यामध्ये पराभवाचा दोष सगळ्या स्थानिक लोकांचा आहे. स्थानिक नेते, कार्यकर्ते, चंद्रकांत पाटील आणि माझ्यासारख्या लोकांचा आहे. असं मत त्यांनी मांडल.

निवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आले होते, पण त्यांना यात दोषी धरणं चुकीचे आहे. कारण स्थानिक लोकांनी त्यांना जे सांगितलं तेच त्यांनी केलं. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील प्रचाराला आले होते पण त्यांना यात दोषी धरणं चुकीचे आहे. ते आमच्या पक्षाचे नाहीत ते सहयोगी पक्षाचे नेते आहेत. तरीही ते आले आणि त्यांना प्रचार केला. पण यात त्याची चूक नाही. चूक स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची आहे कारण आम्ही फिल्डवर होता, आमची चूक आहे, असं रोकठोक मत काकडे यांनी व्यक्त केले.

Tags

follow us