Abdul Sttar : हनुमानासारखा भक्त असतो तर….; विखेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सत्तारांचं मोठ विधान

Abdul Sttar On Radhakkrushn Vikhe Patil : शिवसेनेचे असलेले राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठ विधान केलं आहे. सत्तार म्हणाले की, जर मी हनुमानाप्रमाणे त्यांचा भक्त असतो. तर मी छाती चिरून दाखवली असती. माझी छाती फाडून बघितली तरी राधाकृष्ण विखे पाटील दिसतील. तर एकनाथ शिंदेंनी […]

SATTAR VIKHE

SATTAR VIKHE

Abdul Sttar On Radhakkrushn Vikhe Patil : शिवसेनेचे असलेले राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठ विधान केलं आहे. सत्तार म्हणाले की, जर मी हनुमानाप्रमाणे त्यांचा भक्त असतो. तर मी छाती चिरून दाखवली असती. माझी छाती फाडून बघितली तरी राधाकृष्ण विखे पाटील दिसतील. तर एकनाथ शिंदेंनी त्यांना महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या काळात महसूल विभागात महत्त्वाचे निर्णय होत आहेत. तसेच कुणाला नाही वाटत आपला मित्र मुख्यमंत्री व्हावा. मात्र त्यांना अडचणीत टाकणारे प्रश्न विचारू नका असं देखील यावेळी सत्तार म्हणाले आहेत.

ज्यावेळी सत्तारांनी हे वक्तव्य केलं. त्यावेळी स्वतः मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या सोबतच होते. ते शेतीच्या नुरसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी गारपिटीच्या बाबतीत कदाचित बघितलं असेल तर वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळे अवकाळी पाऊस झाला आहे ते पंचनामे होणार आहे ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेला शेतकरी आहे. तो वंचित राहणार नाही त्यांचे पंचनामे होणार आणि आताही काही नवीन पहिलेही पंचनामे झाले पंचनामे केली जाईल वस्तुनिष्ठ पंचनामे रब्बी असू द्या खरी असू द्या यामध्ये आता आपण बघितलं तर अवकाळी पाऊस आहे गारपीट आहे याची निश्चित पंचनामे केले जातील झालेल्या नुकसानाची भरपाई जे काही निकष नियम आहे त्याप्रमाणे दिले जाईल. असं सांगितलं

सत्तारांच्या या विधानाने राज्यात मुख्यमंत्री बदलणार का या चर्चांना बळ मिळालं आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटलांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार का याकडे देखील सर्वांच लक्ष लागलं आहे. दरम्यान सध्या गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक राजकीय चर्चा रंगवल्या जात आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याची देखील चर्चा चालू होती. यावर नंतर त्यांनी मी राष्ट्रवादीतच राहणार असे उत्तर दिले आहे.

यानंतर काल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 15 दिवसांमध्ये मुख्यमंत्री बदलणार असे भाष्य केले आहे. यासाठी दिल्लीमध्ये हालचाली सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. यानंतर आज अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 3 दिवसांच्या सुट्टीवर जाणार असल्याचे कळते आहे. यावरुन आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.

Ajit Pawar यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी दिल्लीत हालचाली, ‘या’ नेत्याने दिला दुजोरा

त्यामध्येच गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या विखेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत सात्तारांचं मोठ विधान देखील सूचक आहे. सत्तारांच्या या विधानाचा अर्थ राज्यात मुख्यमंत्री बदलणार का या चर्चांना बळ मिळालं आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटलांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार का याकडे देखील सर्वांच लक्ष लागलं आहे.

दुसरीकडे राज्यात सध्या मुख्यमंत्री पदावरून चर्चांना उधान आलं आहे. ठिकठाकाणी आपल्या नेत्याच्या भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्ते बॅनरबाजी करताना दिसत आहेत. यामध्ये नुकतचं राष्ट्रवादीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच भावी मुख्यमंत्री असतील, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. काल सांगली दौऱ्यावर असतांना त्यांनी हे मोठं विधान केलं आहे. कोल्हे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार विरुद्ध जयंत पाटील यांच्यात सुप्त संघर्ष असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Exit mobile version