Download App

Vijay Vadettiwar : फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही टेरर नेते, पाहू त्यांचं किती काळ जमतं

Vijay Vadettiwar : देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही टेरर नेते आहेत त्यामुळे त्यांचं किती काळ जमतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा ते त्याला ती चाकी रिक्षा म्हणत होते. तर आता त्यांच्या या तीन पक्षांच्या सरकारला काय तीन चाकांची घसरगाडी म्हणायचं का? असा सवाल कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला ते नागपूरमध्ये बोलत होते. (Vijay Vadettiwar Criticize Devendra Fadanvis and Ajit Pawar )

Baipan Bhari Deva : जुन्या आठवणींमध्ये रमल्या अभिनेत्री

पुढे वडेट्टीवार यांनी म्हटलं की, सत्तेसाठी राजकारण्यांचा एवढा हावरटपणा राज्याने कधीही पाहिलेला नाही. तर जनतेची आता मतदानाला जाण्याची इच्छा सुद्धा राहिली नसल्याचं त्यांनी सांगितलं. यावरून राज्यातील राजकारण्यांना लाज वाटावी अशी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात शेतकरी संकटात आहे. मात्र सत्तेसाठी सुरू असलेला हा वाद लज्जास्पद आहे. लोक या राजकारण्यांची जिरवण्यासाठी वाट पाहत आहेत. अशी टीका कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

‘टोमॅटो-टोमॅटो काय करता, परवडत नसेल तर खाऊ नका’; सदाभाऊंनी फटकारले!

तसेच ते पुढे म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये जर अर्थ खातं अजितपवारांना मिळालं तर ज्या अजितदादांमुळे शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडला तसा आता बाहेर पडणार का? तसेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही टेरर नेते आहेत त्यामुळे त्यांचं किती काळ जमतं हे पाहू. तर शिंदे गटाला 2-3 मंत्रीपदं मिळतील पण उरलेले कसे शांत होतील?

मंत्रालयात या सरकारकडून लुट सुरू आहे. असं एकही कामं नाही ज्यासाठई पैसे मोजावे लागत नाही. तसेच हे केवळ इंजिनचच सराकर आहे. त्याला डबेच नाहीत. म्हणजे या डबे नसलेल्या सरकारमध्ये लोकांना स्थानच नाही. केवळ सत्तेमध्ये सहभागी होणाऱ्यांनाच स्थान आहे. अशी टीका राज्यातील शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारवर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Tags

follow us