गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Thackeray) पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाचे अनेक खासदार नाराज असल्याचे समोर आले आहेत. काल झालेल्या बैठकीला सर्व 9 खासदार हजर होते, यातील काही खासदार ऑनलाईन तर ऑफलाईन हजर होते. मात्र यातील काही खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशातच आता या सर्व प्रकरणातवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना खासदार नाराज असल्याची चर्चा सुरू असताना आज आमदार आदित्य ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘अफवांवर विश्वास ठेऊ नका, काल सर्वजण बैठकीला हजर होते. कोणीही नाराज नाही. जो आमच्या सोबत, त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो. कोणीही नाराज नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी मोठं विधान केलं आहे. तुमाने म्हणाले की, ‘उबाठामध्ये फारच असंतोष आहे.
मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा बंड होणार?, खासदार वेगळा गट स्थापण करणार?
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर सात खासदारांचा विश्वास आहे. त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदे सारखा कर्तव्यनिष्ठ नेता समाजाला न्याय देऊ शकतो असा त्यांना विश्वास आहे. त्यामुळे लवकरच ऑपरेशन टायगर यशस्वी झालं याची बातमी मिळेल. चर्चा सुरू नाही तर सर्वकाही ठरलं आहे. सर्व चौकशी झाली आहे. फक्त लवकरच ऑपरेशनची तारीख बाकी आहे. लवकरच ऑपरेशन टायगर यशस्वी झालं याची बातमी मिळेल.’
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाचे काही खासदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे खासदारांना भेटत नाहीत, या खासदारांना मदत केली जात नाही. खासदार भेटायला गेल्यास त्यांची भेट न घेता उद्धव ठाकरे विरोधी नेत्यांना भेटत असल्याने खासदारांनी नाराजी व्यक्त केली असून हे खासदार बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
