Market Committee Election : खेड बाजार समितीवर राष्ट्रवादीचीच बाजी, दिलीप मोहितेंसह 10 जणांचा विजय

Market Committee Election Counting Votes : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आज मतदार कोणाला कौल देणार […]

Untitled Design   2023 04 29T095706.689

Untitled Design 2023 04 29T095706.689

Market Committee Election Counting Votes : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे.

त्यामुळे आज मतदार कोणाला कौल देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आज राज्यातील 95 बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे. 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. त्यातील 34 बाजार समित्यांची कालच मतमोजणी झाली आहे. त्याच बरोबर काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी आज देखील मतदान होणार आहे.

यामध्ये पुण्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीने आपला गड राखाला आहे. याठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहीते यांच्यासह 10 जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस विरूद्ध सर्व पक्ष अशी लढत झाली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी 10, कॉंग्रेस 1, भाजप 2, ठाकरे गट 3, अपक्ष 2 असा विजय झाला आहे.

Market Committee Election : राज्यातील 95 बाजार समित्यांची आज मतमोजणी, मतदारांचा कौल कोणाला?

प्रत्येक पक्षाने आपआपल्या पद्धतीने निवणुकीची तयारी केली होती. काही ठिकाणी विरोधात असलेले पक्ष एकत्र येऊन पॅनल बनवले. तर काहीजण दुसऱ्या पक्षातील उमेदवार आपल्या पक्षात आणले. अनेक ठिकाणी मात्र बाजार समित्यांमध्ये ऐनकेन प्रकारे आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचं त्यासाठी कट्टर विरोधकही एकत्र येताना पाहायला मिळाले. याचा प्रत्यय आला राज्यात अनेक ठिकाणी आला.

कृषी उत्पन्न बाजार समित्या या ग्रामीण भागात राजकारणाचं महत्त्वाच्या मानल्या जातात. कारण त्यातून तेथिल राजकारणात राजकीय नेत्यांनी जम बसवलेला असतो. त्यामुळे सध्या देश आणि राज्यात गावापासून शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलं स्थान बळकट करण्यासाठी सर्व पक्षांनी कंबर कसली.

Exit mobile version