Kundmala Bridge Collapse Pune : मावळ तालुक्यातील येथील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील (Kundmala Bridge Collapse Pune) पूल अचानक कोसळला. या दुर्घटनेत 18 लोक जखमी झाले आहेत. तर 38 व्यक्तींना वाटचविण्यात यश मिळालं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारा दरम्यान दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले.
या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 15, 2025
इंद्रायणी नदीवर आजूबाजूच्या गावांना जोडणारा लोखंडी पूल आहे. आज दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास हा लोखंडी पूल कोसळला. या ठिकाणी अंदाजे 100 पर्यटक उपस्थित होते. पूल अचानक कोसळल्याने बरेच जण खाली पाण्यात पडले. पाण्याचा प्रवाह वेगात होता. त्यामुळे या प्रवाहाबरोबर अनेक जण वाहत गेले. सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला. घटनेची माहिती कळताच पोलीस आणि बाकीच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF)चे 2 पथक, आपदा मित्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि PMRDA चे अग्निशमन दल व स्थानिक मदत बचाव संस्था इत्यादी घटनास्थळी दाखल झाले. पाण्यात पडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले. या दुर्घटनेमध्ये एकूण 38 व्यक्तींचा बचाव करण्यात आला आहे. त्यापैकी 18 व्यक्ती जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने सोमाटणे फाटा, ता. मावळ येथील पवना रुग्णालय, मायमर हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. उपचारा दरम्यान दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. पुलाच्या कोसळलेल्या भागाखाली नदीपात्राच्या पाण्यात एकूण 03 व्यक्ती अडकले असल्याचे प्राथमिक माहिती आहे.
मावळमधील इंद्रायणीवरील पूल कोसळला; वाहून गेलेल्यांपैकी 5 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त
घटनेची माहिती मिळतातच अग्निशमनदल, पोलिस आणि एमडीआरफचे बचाव पथक हे बचाव कार्यासाठी दाखल झाले आहेत. तसेच वाहून गेलेल्या पर्यकांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान पुण्यातील विविध पर्यटन स्थळी पावसाळी सुरू झाला की, पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र मावळ येथे घडलेल्या या दुर्घटनेमध्ये इंद्रायणी नदीचं मोठं पात्र याठिकाणी असल्याने पर्यटकांच्या जीवाला जास्त धोका आहे. तसेच हा पूल जुन्या अवस्थेत होता.मात्र लोक मोठ्या प्रमाणात त्यावरून ये जा करत होते.
या दुर्घटनेत 40 पेक्षा जास्त लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यातील 38 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी या निर्णयाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.