Sanjay Kakade : कसब्यातला उमेदवार चुकलाच, संजय काकडे यांची कबुली?

कसबा पोटनिवडणुकीतला पराभव हा चंद्रकांत पाटील, स्थानिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचा काहीही संबंध नाही, असे मत माजी खासदार आणि भाजपचे उपाध्यक्ष संजय काकडे यांनी व्यक्त केले आहे. लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी माजी खासदार संजय काकडे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये संजय काकडे […]

Sanjay Kakade

Sanjay Kakade

कसबा पोटनिवडणुकीतला पराभव हा चंद्रकांत पाटील, स्थानिक नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांचा काहीही संबंध नाही, असे मत माजी खासदार आणि भाजपचे उपाध्यक्ष संजय काकडे यांनी व्यक्त केले आहे. लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात लेट्सअप मराठीचे संपादक योगेश कुटे यांनी माजी खासदार संजय काकडे यांची मुलाखत घेतली.

या मुलाखतीमध्ये संजय काकडे यांनी कसबा पोटनिवडणूक,सध्याची राजकीय परिस्थिती आणि राजकीय भविष्य यावर रोखठोक मते व्यक्त केली. संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी येथे क्लिक करा : Sanjay Kakade: सातवी पास संजय काकडेंचा सत्ता दरबारात शिरकाव कसा….अनकट संजय काकडे

उमेदवार चुकला?

कसबा पोटनिवडणुकीत फक्त उमेदवार म्हणून विचार केला तर हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांच्या तुलनेत धंगेकर कायम सरस होते. त्यामुळे उमेदवार चुकला असं रोखठोक मत काकडे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, जो उमेदवार स्वतःच्या प्रभागात लीड मिळवू शकत नाही. त्याला उमेदवारी देणे आमची चूक होती.

निवडणुकीपूर्वी पक्षाने सर्वे केला होता पण तो सर्वे आम्हाला दाखवला नाही. तो थेट दिल्लीला पाठवण्यात आला. जर तो सर्वे आम्हाला दाखवण्यात आला असता तर त्यातल्या चुका सांगता आल्या असत्या, असं मतंही काकडे यांनी यावेळी व्यक्त केले.

ब्राह्मण समाज नाराज होता?

कसाब पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाज नाराज असल्याचा चर्चा होत्या. पण तसं काही चित्र नव्हतं, असं मत काकडे यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की ब्राह्मण समाज नाराज असता तर आम्हाला ६३ हजार मते पडली नसती. काही प्रमाणात ब्राह्मण समाज नाराज होता, पण त्याचा विशेष काही फरक पडला नाही.

बापट स्वतःहून प्रचाराला आले

कसबा निवडणुकीत आजारी गिरीश बापट यांना प्रचाराला आणल्यामुळे भाजपवर टीका झाली. पण आम्ही बापट यांना प्रचाराला आणलं आम्ही आणलं नाही ते स्वतःहून आले. असं स्पष्टीकरण संजय काकडे यांनी दिलं. ते म्हणाले की गिरीश बापट यांनी १० निवडणुका पाहिल्या आहेत, म्हणजे ५० वर्ष त्यांनी राजकारण पाहिलं आहे. त्यातील ३० वर्षे त्यांनी सक्रिय राजकारण केलं आहे. त्यामुळे अचानक लागलेल्या निवडणुकामुळे ते स्वतःहून प्रचाराला आले.

Exit mobile version