Download App

चांगल्या आरोग्यासाठी व्यसनांपासून दूर राहा, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकरांचा विद्यार्थ्यांना संदेश

  • Written By: Last Updated:

पुणे : विद्यार्थ्यांना आरोग्य चांगले राहावे म्हणून व्यसनापासून दूर रहावे आणि स्वच्छतेचे नियम कटाक्षाने पाळावे. दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींमधून स्वच्छतेची आवड जोपासावी. तसेच व्यायामही आरोग्यसाठी उपयुक्त आहे. त्यामुळं विदार्थ्यांनी स्वच्छता आणि व्यामाय याकडे लक्ष दिलं पाहिजे, असा संदेश पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर (Dr. Raman Gangakhedkar) यांनी विद्यार्थ्यांना दिला.

‘राजे-महाराजे इंग्रजांना सामिल’ गांधींना फडणवीसांनी सुनावलं; म्हणाले, ‘राजघराण्यांचा..,’ 

शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात (National Children’s Scientific Exhibition) आरोग्य आणि स्वछता या विषयावर गंगाखेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी गंगाखेडकर यांनी मानवी जीवनातील स्वच्छतेचे महत्व सांगताना दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमधून स्वच्छतेच्या सवयी कशा विकसित करता येतील ते उदाहरणांसह सांगितले. ते म्हणाले, काहीही खाण्याआधी हात स्वच्छ धुणे, दररोज सकाळी उठल्यावर व संध्याकाळी झोपण्यापूर्वी दात घासणे, कोणत्याही उघड्या पृष्ठभागावर स्पर्श करणे टाळणे या सवयी आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत. हात न धुता त्याच हाताने खाल्यास डायरियासारखे आजार होतात.

अस्वच्छतेमुळे विविध त्वचा विकार होतात. स्वच्छतेसोबत व्यायामही आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो. चालणं हा सर्वात उत्तम व्यायामाचा प्रकार आहे. त्यामुळं दररोज चालण्याची सवय ठेवावी. किशोरवयातील काही चुकीच्या सवयीमुळं त्याचा प्रौढ जीवनावर परिणाम होता. व्यसनाची लागलेली सवय मोडणे कठीण जाते. याबाबत मित्रांना वेळीच नाही म्हणायला शिकले पाहिजे, असे डॉ. गंगाखेडकर म्हणाले.

‘आंबेडकरांच्या प्रस्तावाचा विचार…’; वंचितच्या फॉर्म्युल्यावर जयंत पाटलांचं मोठं विधान 

ते म्हणाले, निरोगी आयुष्य जगण्यासाठी सकारात्मकता महत्वाची असल्याचे सांगून ते म्हणाले, मुलांची स्वतःची स्पर्धा ही स्वतःशीच असली पाहिजे. प्रत्यकाने स्वतःमधील क्षमता ओळखुन त्या वाढविण्याचा प्रयत्न करावा. स्वतःमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे सर्वात महत्त्वाचे आहे. स्वतःची कौशल्ये विकसित करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे जीवनात लहान लहान गोष्टीमधील स्वच्छता, समाजातील लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जाणीव जागृती निर्माण करणे, देशाची आरोग्य विषयक धोरणे निश्चित करण्यासाठी योगदान देणे, स्वतःशी व देशाशी प्रामाणिक राहून देशाची सेवा करणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्लास्टिकचा अतिवापर मानवाच्या शरीरावर खूप परिणाम करत आहे. प्लास्टिकचा अंश आता मानवी रक्तामध्ये सापडत आहे ही धोक्याची घंटा आहे, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ.गंगाखेडकर यांनी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे समाधान केले.

यावेळी व्यासपीठावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे, सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे, डॉ.नेहा बेलसरे, विज्ञान विभागाच्या प्रमुख तेजस्विनी आळवेकर, सहायक अधिव्याख्याता वृषाली गायकवाड आदी उपस्थित होते.

follow us