Download App

IND vs NZ मालिकेसाठी मुंबई अन् अहमदाबादला नकार, BCCI चा मोठा निर्णय, ‘या’ 8 शहरांमध्ये होणार सामने

IND vs NZ : भारतीय संघ नवीन वर्षाच्या सुरुवातीला घराच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) पाच टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका

  • Written By: Last Updated:

IND vs NZ : भारतीय संघ नवीन वर्षाच्या सुरुवातीला घराच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) पाच टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयकडून तयारी देखील सुरु करण्यात आली आहे. बीसीसीआयकडून (BCCI) या मालिकेतील सामन्यांसाठी आठ ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या मालिकेतील एकही सामना मुंबई किंवा अहमदाबाद येथे होणार नाही. या मालिकेतील आठही सामने आठ शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार ज्यामध्ये नागपूर आणि हैदराबादचा समावेश आहे.

शॉर्टलिस्टेड ठिकाणे

मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेतील सामने जयपूर, मोहाली, इंदूर, राजकोट, गुवाहाटी, हैदराबाद, नागपूर आणि त्रिवेंद्रम येथे होणार आहे. भारतीय संघ न्युझीलंडविरुद्ध जानेवारी 2026 मध्ये तीन एकदिवसीय सामने आणि त्यानंतर पाच टी-20 सामने खेळणार आहे. ही मालिका आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या आधी खेळवली जाईल. 2026 ची आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा (ICC T20 World Cup 2026) भारत आणि श्रीलंका येथे खेळवली जाणार आहे. त्यामुळे दोन्ही संघासाठी ही मालिका महत्वाची ठरणार आहे.

तर या मालिकेपूर्वी भारतीय संघ ऑक्टोबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे आणि  यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्व फॉरमॅटची मालिका खेळणार आहे.

भारतीय संघाचे वेळापत्रक

वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका अहमदाबाद आणि नवी दिल्ली येथे होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. हे दोन कसोटी सामने कोलकाता आणि गुवाहाटी येथे खेळवले जातील. यानंतर दोन्ही संघात  रांची, रायपूर आणि विझाग येथे तीन एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या नाराजीनंतर एसटीच्या अधिकृत हॉटेल- मोटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कटक, न्यू चंदीगड, धर्मशाळा आणि लखनौ येथे 4 टी-20 सामने खेळवले जातील. यानंतर न्यूझीलंडविरुद्ध जानेवारी महिन्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि त्यानंतर पाच टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. यानंतर  फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारत आणि श्रीलंकेत टी-20 विश्वचषक 2026 खेळवला जाईल.

follow us