Download App

IND vs PAK : पाकिस्तान बॅकफूटवर! एकामागोमाग तीन धक्के; भारताने लावली विकेट्सची रांग

Champions Trophy 2025 IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामन्यात भारताची बाजू भक्कम झाली आहे. एकामागोमाग विकेट्स पडल्याने (Champions Trophy 2025) पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे. कर्णधार रिजवान आणि सऊद या दोघांची भागीदारी तुटल्यानंतर पाकिस्तानी फलंदाज फार (Team India) काळ टिकू शकले नाहीत. एकामागोमाग विकेट पडत राहिल्या त्यामुळे पाकिस्तानच्या धावसंख्येला ब्रेक लागला. 45 व्या ओव्हरपर्यंत पाकिस्तानच्या 213 धावा झाल्या होत्या आणि सात खेळाडू तंबूत परतले होते.

भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली त्यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजांना जास्त धावा करता आल्या नाहीत. फलंदाज सुरुवातीपासूनच अडखळत खेळत होते. याचा फायदा भारतीय गोलंदाजांनी घेतला. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. धावांना ब्रेक लावला आणि ठराविक अंतरावर विकेट घेण्यात यशस्वी ठरले. अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या यांनी विकेट घेत पाकिस्तानला धक्के दिली.

IND vs PAK : पाकिस्तानने टॉस जिंकला, फलंदाजी करणार; टीम इंडियालाही सुखद धक्का

उपांत्य फेरीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकण्यासाठी भारताला या सामन्यात विजय गरजेचा आहे, तर पाकिस्तानला स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्यात रोमांच पाहायला मिळेल, अशी शक्यता आहे. दरम्यान, सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने ऋषभ पंत आजारी असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे तो या सामन्यासाठी उपलब्ध नसेल. पण त्यामुळे भारताच्या प्लेइंग इलेव्हनला धक्का बसणार नाही. तो उपलब्ध नसल्याने केएल राहुलच यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळताना दिसणार आहे.

फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यानेही चांगली गोलंदाजी केली. 47 व्या ओव्हरमध्ये कुलदीपने नसीम शाहच्या रुपात पाकिस्तानला आणखी एक धक्का दिला. 47 ओव्हरधमध्ये पाकिस्तानी संघाच्या 222 धावा झाल्या होत्या. वेगवान गोलंदाज हर्षित राणाने 48 वी ओव्हर टाकली. या षटकात त्याने फलंदाजांना बांधूनच ठेवले. अचूक टप्प्यावर मारा केल्याने फलंदाजांना धावाच करता आल्या नाहीत.

टीम इंडिया पु्न्हा फ्लॉप! ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कोरलं नाव; मालिका 3-1 ने जिंकली 

follow us