Download App

Women T20 WC 2023 : भारतीय महिलांची सेमी फायनलमध्ये धडक

केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) धरतीवर महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगलेला पाहायला मिळत आहे. आयर्लंडविरुद्ध (ireland) झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी केली. भारतानं आयर्लंडसमोर 156 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मात्र, पावसामुळं 8.2 षटकांत 2 बाद 54 धावाच करता आल्या. पाऊस (Rain)थांबण्याची चिन्हं दिसत नसल्यानं या सामन्यात भारतीय संघानं डकवर्थ लुईस नियमानुसार (Duckworth Lewis Rule)5 धावांनी विजय मिळवलाय.

भारतीय संघानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतानं सुरूवातीपासूनच चमकदार खेळी केली. मराठमोळ्या स्मृती मंधानानं शानदार खेळी करून आयर्लंडच्या गोलंदाजांना पुरता घाम फोडला. स्मृतीनं 56 चेंडूत 87 धावांची खेळी केली. त्यामध्ये 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे.

राज्यपालांनी 12 आमदारांची नावं लटकून का ठेवली? नेमकं कारण आलं समोर…

भारतीय संघाच्या फलंदाजीची सुरुवात चांगली झाली. संघाची धावसंख्या 62 असताना भारताला शेफाली वर्माच्या (24 धावा) रुपात पहिला झटका बसल्याचं दिसून आलं. पुढे स्मृती मंधानानं डाव सावरला पण तिला साथ देत असलेली भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर 13 धावांवर बाद झाली.
हरमनप्रीत आणि स्मृती यांच्यात 38 चेंडूत 52 धावांची महत्त्वाची भागीदारी झाली. तर युवा खेळाडू रिचा घोषला खातं देखील उघडता आलं नाही. विकेट पडण्याचं सत्र सुरूच होतं पण स्मृतीनं ताबडतोब खेळी करून भारताला मजबूत स्थितीत पोहचवलं.

भारतीय संघाच्या 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. आयर्लंडनं 8.2 षटकांत दोन गडी गमावून 54 धावा केल्या. गॅबी लुईस 25 चेंडूत 32 आणि कर्णधार एल डेलनी 17 चेंडूत 20 धावांवर नाबाद राहिले.

भारताकडून रेणुका सिंगनं एक विकेट घेतली. दरम्यान, या गटातून इंग्लंडचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. सध्या इंग्लंड ब गटातील गुणतालिकेत तीन सामन्यांत तीन विजय आणि सहा गुणांसह अव्वल स्थानावर आहे.

Tags

follow us