Download App

‘जनतेचा कौल मान्य, लोकसभेला चित्र बदलून कॉंग्रेसच विजयी होणार’; नाना पटोलेंचा विश्वास

  • Written By: Last Updated:

मुंबई : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत (Telangana Assembly Elections) जनतेने काँग्रेस (Congress) पक्षाला भरघोस मतदान करून विजयी केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची अपार मेहनत व जनतेचा विश्वास यामुळेच काँग्रेसला तेलंगणात मोठे यश मिळाले आहे. कर्नाटकनंतर दक्षिण भारतातील दुसऱ्या महत्वाच्या राज्यात काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे तर दक्षिण भारतातून भारतीय जनता पक्षाला जनतेने दारे बंद करून भाजपाच्या धर्मांध अजेंड्याला दक्षिण भारतात स्थान नाही हेच येथील जनतेने दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे.

तेलंगणाच्या विजयाचा जादूगार ‘रेवंत रेड्डी’; मुलीच्या लग्नासाठी मिळला होता फक्त 12 तासांचा जामीन 

विधानसभा निकालावर टिळक भवनमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, चार राज्यातील जनतेने दिलेला कौल काँग्रेस पक्षाला मान्य आहे. काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चारही राज्यात भरपूर मेहनत घेतली होती पण लोकशाहीत जनतेचा कौल सर्वोच्च असतो, तो आम्ही नम्रपणे मान्य करतो. या विधानसभा निवडणुकीत ज्या त्रुटी राहिल्या त्याचा अभ्यास करून लोकसभा निवडणुकीसाठी जोमाने तयारी करू. विधानसभेतील चित्र लोकसभेला राहत नाही. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस पक्ष विजयी झाला आणि भाजपचा पराभव झाला होता. ते चित्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत दिसले नाही. त्याप्रमाणे 2024 च्या लोकसभा निवडणुकीतही आजचे चित्र दिसणार नाही. त्यात बदल होईल व कॉंग्रेस पक्षाचा मोठा विजय होऊन केंद्रात सत्तेत येईल, असा विश्वास पटोलेंनी व्यक्त केला.

Rajasthan Election : राजस्थानचा ‘जादूगर’ फेल, काँग्रेसचं नेमकं कुठं चुकलं?

पटोले म्हणाले, भारतीय जनता पक्ष हिंदू-मुस्लीम या दोन धर्मात भांडणे लावून धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करत आहे. काही राज्यांत त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला. काँग्रेस अशा प्रकारचे राजकारण करत नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचे सामाजिक न्यायाये राज्य आहे. भाजपचे विभाजनवादी राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही, राज्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. महाविकास आघाडी राज्यात व देशपातळीवर इंडिया आघाडी मजबूत असून आगामी निवडणुकीती जनेतचा विश्वास संपादन करू, असं पटोले म्हणाले.

Tags

follow us