Download App

Raj Thackray : विधानसभा जिंकू अन् सत्ता आणू…राज ठाकरेंचा निर्धार; विरोधकांना फटकारले

अहमदनगर : राज्यातील इतर सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्तीत जास्त जागा मनसेना युती, ना आघाडी मनसेचं इंजिन स्वबळावर..; राज ठाकरेंचं ठरलेलंच सांगितलं लढणार आहे, अशी भूमिका आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे ( Raj Thackeray News) यांनी जाहीर केलीय. त्या जागा जास्तीत जास्त मताधिक्याने जिंकून येवू, असं देखील त्यांनी स्पष्ट केलीय. विधानसभा निवडणुकानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेवा सत्तेत असेल, असा दावा देखील राज ठाकरे यांनी केलाय.

विधानसभा निवडणूकAssembly Election : अर्ज भरायला 6 अन् बंडखोराला थंड करण्यासाठी 4 दिवस; 39 दिवसांत निवडणूक संपणार (assembly Election) माझ्या जोरावर लढवणार आहे. माझ्या सभेत मी बोललो आहे. सहज म्हणून बोललो नाही, सहकाऱ्यांना उत्साह यावा यासाठी बोललो नाही. विधानसभा निवडणूका आम्ही जिंकू आणि सत्ता आणू. माझी भूमिका मी मांडली आहे. आमच्या पक्षाचा जाहीरनामा लवकरच येईल, असं देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.

Raj Thackeray : टोल आंदोलनाचं काय झालं? असं कुणी विचारलं तर, त्यांना मुंबईचं उदाहरण द्या!

काँग्रेस सरकार होतं तेव्हापासून टोल माफीची (mumbai toll tax free) आमची मागणी होती. आपली फसवणूक होते, हे लोकांना वाटतं होतं. टोलसंदर्भात घेतलेल्या निर्णयावर सरकारचे मी आभार मानेन. निवडणूकीच्या तोंडावर हे झालेलं आहे.मतं पाहिजे म्हणून टोल बंद केले, असं होणार नाही आणि असं होऊ देणार नाही. अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. अनेकांनी शब्द दिले. टोल नाके बंद करू, हा निर्णय घेतला याचं समाधान आहे.

Raj Thackeray :  नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात! कणकवलीत घेणार सभा

लोकांना पण पैसे कुठून येतात, हे माहित नाही. कोणाच्या खिशात किती गेले? याचा अंदाज नव्हता. आता श्रेय घेण्यासाठी सगळे येतील, अशी टीका देखील राज ठाकरे यांनी केलीय. राज ठाकरेंनी एखादं आंदोलन पुढे नेलं की असंच होणार आहे. सरकारकडे आज पैसे नाही. तुम्ही वाटावाटी करत आहात. अशाने राज्य कंगाल होईल, अशी टीका देखील त्यांनी केलीय.

राज्यात सर्वात जास्त जागा मनसे लढवणार आहेत. आमचे दौरे आता सुरु होतील, असं राज ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर टोलनाके बंद करायचे अन् नंतर सुरू करायचे, असं होवू देणार आहे. अशी जनतेची फसवणूक बंद करा असं म्हणत राज ठाकरेंनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत. आता सरकारने यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचं लोकांना देखील समाधान असल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.

follow us