Download App

Bigg Boss Marathi : ‘दम असेल तर तोंडावर बोल’; निक्कीचं संग्रामला खुलं चॅलेंज

Bigg Boss Marathi Season 5 Day 51: 'बिग बॉस मराठी'चा खेळ सुरू होऊन (Bigg Boss Marathi Season 5 ) आता 50 दिवस पूर्ण झाले आहेत.

Bigg Boss Marathi Season 5 Day 51: ‘बिग बॉस मराठी’चा खेळ सुरू होऊन आता 50 दिवस पूर्ण झाले आहेत. (Bigg Boss Marathi Season 5) 50 दिवसानंतरही सदस्य धमाका करताना दिसून येत आहे. निक्की, (Nikki Tamboli) अरबाज (Arbaaz) आणि संग्राम (Sangram Chougule) यांच्यात कायम वाद होताना दिसून येतात. आता आजच्या भागातही प्रेक्षकांना त्यांच्यात खटके उडताना दिसून येणार आहेत. ‘दम असेल तर तोंडावर बोल’, असं निक्की संग्रामला खुलं चॅलेंज (Challenge) देताना दिसून येईल.


‘बिग बॉस मराठी’च्या समोर (Bigg Boss Marathi New Promo) आलेल्या प्रोमोमध्ये निक्की संग्रामला खुलं चॅलेंज देताना दिसत आहे. तर संग्रामही निक्कीला तिच्या खेळाबद्दल बोलताना दिसून येत आहे. प्रोमोमध्ये निक्की आणि अरबाजला संग्राम म्हणतोय,”जवळच्या माणसांना खड्ड्यात घालायचं”. त्यावर निक्की म्हणतेय,”फुसकी बाँबसारखं इनडायरेक्ट बोलायचं नाही या घरात…दम असेल तर तोंडावर बोलायचं”.

संग्राम पुढे म्हणतोय,”कोणत्या गोष्टी कशा घ्यायच्या हे तुम्ही ठरवताय”. पुढे निक्की म्हणतेय,”स्वत:चं डोकं थोडं वापरा आणि नीट बोला. ना तळ्यात ना मळ्यात अशा परिस्थितीत तुम्ही अडकले आहात”. संग्राम पुढे म्हणतोय,”तुमच्यातल्या एकाला तुम्हीच बाहेर काढणार आहात”.

‘बिग बॉस मराठी’च्या घराला goodbye म्हणतोय वैभव चव्हाण

महाराष्ट्राच्या मातीतला बारामतीचा रांगडा गडी म्हणजेच अभिनेता वैभव चव्हाणचा ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील प्रवास संपला आहे. या आठवड्यात वैभवसह अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर आणि आर्या हे सदस्य नॉमिनेट झाले होते. यात आर्याला बिग बॉसच्या घरातून निष्कासित केले गेले. तर प्रेक्षकांच्या वोटिंगचा मान ठेवच वैभवला घर सोडावं लागलं.

Bigg Boss Marathi: ‘दम असेल तर मला बाहेर काढून दाखव’, जान्हवीचं निक्कीला चॅलेंज

वैभव चव्हाणने आपल्या कातिल लूकने सर्वांनाच घायाळ केलं आहे. लढवैया, बिनधास्त आणि जिद्दी व्यक्तिमत्त्व असणारा वैभव ‘बिग बॉस मराठी’चा खेळ खेळण्यात कुठेतरी कमी पडला. वैभव चव्हाण अशी ओळख मिळवण्यापेक्षा ‘अरबाज 2’ अशी ओळख त्याने मिळवली. कधी गद्दारी केल्याने तर कधी रांगड्या मातीत परदेशी प्रेमाचं रोपटं लावल्याने तो चर्चेत होता. आता वैभव घराबाहेर पडल्याने त्याच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.

follow us