Bigg Boss Marathi : अभिजीत-वैभवमध्ये राडा; निक्की अन् अभिजीतच्या मैत्रीत येणार दुरावा?

Bigg Boss Marathi : अभिजीत-वैभवमध्ये राडा; निक्की अन् अभिजीतच्या मैत्रीत येणार दुरावा?

Bigg Boss Marathi Season 5 Day 46 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi Season 5) घरात रोज एक राडा पाहायला मिळत आहे. गेम खेळण्यासोबत वारंवार भांडणेदेखील केली जात आहेत. घरात नुकताच नॉमिनेशन (Nomination) टास्क पार पडला. त्यामुळे घरातील वातावरण बिघडलेले पाहायला मिळत आहे. आज अभिजीत (Abhijeet) आणि वैभवमध्ये (Vaibhav) राडा झालेला पाहायला मिळणार आहे. निक्की (Nikki) आणि अभिजीतमधील विश्वास आणि मैत्रीत तडा गेलाला पाहायला मिळालं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोमध्ये (Bigg Boss Marathi New Promo) अभिजीत आणि वैभव वाद घालताना दिसत आहेत. अभिजीत वैभवला म्हणतोय,”अरे बाबा मी तुझ्या मागे नाही बोललोय”. दरम्यान मध्ये पडत निक्की म्हणतेय,”आम्ही याच्यावर परत विश्वास ठेवला आणि त्याने तेच केलं”. यावर अभिजीत निक्कीला म्हणतोय,”मित्र समजून मी तुझ्याकडे बोलायला येतो ना हीच माझी चूक आहे. यापुढे तू माझ्याकडे येऊ नको मी तुझ्याकडे येणार नाही. असा मित्र आयुष्यात कधी ठेऊ नये”.

अभिजीत निक्कीचं भांडण सुरूच

‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात अभिजीत आणि निक्कीचं नॉमिनेशनवरुन भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. अभिजीत निक्कीला म्हणतोय,”नॉमिनेशनचा आणि जान्हवीचा काय संबंध”. निक्की म्हणतेय,”जान्हवी तुला तुझ्या टीममध्ये हवी होती”. या आठवड्यात निक्की नॉमिनेट झाल्याने ती अभिजीतकडे आपला संताप व्यक्त करत आहे.

Bigg Boss Marathi : वर्षा ताई अन् निक्कीची तू-तू, मैं-मैं संपेचना; आज भाजीवरुन भांडण

‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगलीय वर्षा ताईंची चर्चा

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील वर्षा ताई नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आजही घरातील सदस्य त्यांच्याबद्दल बोलताना दिसणार आहेत. अंकिता, पॅडी आणि सूरज गार्डन एरियामध्ये वर्षा ताईंबद्दल बोलताना दिसणार आहेत. अंकिता म्हणतेय,”जी गोष्ट आपल्याला जमत नाही..त्यातून लांब व्हा”. तर पॅडी दादा म्हणतोय सॉरी बोलून विषय संपवायला हवा.

निक्की आणि वर्षा ताईंमध्येदेखील भाजीवरुन वाद झालेला पाहायला मिळेल. त्यानंतर निक्की वर्षा ताईंना म्हणतेय,”आता दुसरं काय फेकायचं याचं प्लॅनिंग करताय का?”. निक्कीच्या बोलण्यावर वर्षा ताई म्हणत आहेत,”असं हवेत उडवते मी”. पुढे निक्की आणि अरबाज वर्षा ताईंबद्दल बोलताना दिसून येतील.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube