Download App

Javed Akhtar : ‘ती एक नंबरची…’, मानहानीच्या प्रकरणात जावेद अख्तर यांनी कंगनाला सुनावलं

Javed Akhtar: अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) २०२० मध्ये आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येचे प्रकरण चांगलेच गाजले आहे. त्यावेळेस बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) एका वक्तव्याने चांगलीच खळबळ माजली होती. जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी मला आत्महत्येस प्रवृत्त करत असल्याचा खळबळजनक आरोप कंगनाने केला होता.


आता ३ वर्षांनी १२ जून रोजी या प्रकरणावर सुनावणी झाली आहे. सुनावणीच्या दरम्यान जावेद अख्तर यांनी कंगनाने केलेले आरोप (Allegation) खोटे असल्याचे सांगितले आहे. तसेच सोमवारी सुनावणीच्या दरम्यान जावेद अख्तर मुंबईमधील अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटच्या कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. फेब्रुवारी २०२० मध्ये कंगनाने एका मुलाखतीमध्ये संगीत्याले आहे की, या मुलाखतीमध्ये अख्तर यांनी आपल्याला धमकावल्याचा आरोप कंगनाने केला होता.

या पार्श्वभूमीवर अख्तर यांनी कंगना विरोधामध्ये मानहानीचा दावा केला होता. सोमवारी अख्तर यांची या प्रकरणी साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी कंगनाने बदनामी करणारे वक्तव्य केल्याचे अख्तर यांनी न्यायालयाला सांगितले आहे. तसेच या मुलाखतीमध्ये कंगना जे काही सांगितले आहे, ते सगळं खोटे असल्याचा दावा देखील जावेद अख्तर यांनी केला होता. याअगोदर देखील झालेल्या सुनावणीमध्ये जावेद अख्तर यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या निवेदनामध्ये सांगितले होते की, “माझ्यावर असलेले सर्व आरोप खोटे आहेत.

Shah Rukh Khan : चाहत्यांच्या सवालांना किंग खानचे मजेशीर उत्तर; म्हणाला, ‘भावा जेवलास का?’

मी लखनऊचा आहे आणि कोणाला देखील एकेरी नावाने हाक मारत नाही. माझ्यापेक्षा ३०-४० वर्षांनी लहान असलेल्या व्यक्तींना देखील मी ‘आप’ म्हणूनच संबोधत आलो आहे, तरी देखील माझ्यावर झालेले आरोप ऐकून मला खूप आश्चर्य वाटत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. तसेच २०२० मध्ये जेव्हा सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली होती. तेव्हा कंगनाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, या मुलाखतीमध्ये कंगनाने जावेद अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

कंगना म्हणाली होती की, “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले आणि सांगितले होते की, राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंब खूप मोठे लोक आहेत. जर तुम्ही त्यांची माफी मागितली नाही तर तुम्ही तुरुंगात जाणार आणि शेवटी विनाशाचा एकच मार्ग असणार आहे. तो म्हणजे तुम्ही आत्महत्या कराल. त्यावेळी त्यांचे हे शब्द ऐकून मी देखील हादरलो होतो. इतकेच नाही तर कंगनाने जावेद यांच्यावर सुशांतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप देखील केला होता.

Tags

follow us

वेब स्टोरीज