Paresh Rawal Back in Hera Pheri 3 after crises : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘हेरा फेरी 3’ (Hera Pheri 3) बाबत अनेक चर्चांना उधाण होते. ‘हेरा फेरी 3’ अचानक परेश रावल सोडणार असल्याची चर्चा सुरु असल्याने सोशल मीडियावर चाहते नाराजी व्यक्त करत होते. तर आता या चित्रपटाबाबत आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. कारण या चित्रपटात परेश रावल (Paresh Rawal) हे पुन्हा चाहत्यांना भेटणार आहेत.
फडणवीसांचा अजित पवारांना धक्का! कॉंग्रेससह राष्ट्रवादीचा माजी आमदारही भाजपमध्ये जाणार जाणार
या चित्रपटामध्ये काम करणयावर परेश रावल यांनी स्वत: एका पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितले आहे. की, आपण पुन्हा या चित्रपटामध्ये काम करणार आहोत. यावेळी बोलता ते म्हणाले की, जेव्हा एखादा चित्रपट चाहत्यांना प्रचंड आवडलेला असतो. त्याबाबत लोकांच्या भावना जोडलेल्या असतात. त्यामुळे अशा चित्रपटाबाबत अत्यंत सांभाळून काम करावं लागतं. तसेच आमच्यामध्ये काहीही वाद झालेला नव्हता.
आजचा दिवस खास मात्र ‘या’ राशीच्या लोकांसाठी मात्र रेड अलर्ट! जाणून घ्या…
तसेच जनतेने आम्हाला प्रेम दिलंय. त्यामुळे त्यांना तीच गुणवत्ता देण्याची आमची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही पुन्हा तीच ट्युनिंग चाहत्यांना देण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमच्यामध्ये आता सर्व काही ठिक आहे. अशी कबुली देखील यावेळी रावल यांनी दिली.
नेमकं प्रकरणं काय?
अभिनेता अक्षय कुमारचं प्रॉडक्शन हाऊस या चित्रपटाची निर्मिती करत आहे. परेश रावल आणि प्रॉडक्शन हाऊसमध्ये झालेल्या काही वादानंतर परेश रावलविरुद्ध 25 कोटींचा खटला प्रॉडक्शन हाऊसकडून दाखल करण्यात आला होता. यानंतर आता परेश रावलने सायनिंग अमाउंट परत केली असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता परेश रावलने 15 टक्के वार्षिक व्याजदरासह 11 लाख रुपयांची सायनिंग अमाउंट परत केली आहे. याचबरोबर परेश रावलने या सीरिजमधून बाहेर पडण्यासाठी काही पैसे वाढून देखील दिले असल्याचा दावा बॉलीवूड हंगामाने एका सूत्राच्या हवाले केला आहे.
आजपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन, ‘या’ मुद्द्यांवरून सभागृह गाजणार
बॉलीवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, परेश रावल यांना या चित्रपटात काम करण्यासाठी 15 कोटी रुपये देण्यात येणार होते. या रक्कमेपैकी 11 लाख रुपये परेश रावल यांना टर्म शीटनुसार देण्यात आले होते तर उर्वरित रक्कम चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका महिन्यानं मिळणार होते. ‘हेरा फेरी 3’ चं चित्रीकरण पुढील वर्षी सुरु होणार असून 2026 च्या शेवटी किंवा 2027 च्या सुरुवातीला चित्रपट प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे परेश रावल यांना चित्रपटाचे उर्वरित पैसे मिळण्यासाठी आणखी दोन वर्ष वाट पाहावी लागणार होती त्यामुळे त्यांनी या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.