आजपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन, ‘या’ मुद्द्यांवरून सभागृह गाजणार

आजपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन, ‘या’ मुद्द्यांवरून सभागृह गाजणार

The monsoon session of the state legislature will begin today opposition will hold the government to account on issues : आज पासून राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. 18 जुलै पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विविध मुद्द्यावर चर्चा होणार आहे. विरोझक आणि सत्ताधारी यांची यामध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. यामध्ये कोण-कोणते मुद्दे गाजणार जाणून घेऊ…

कोण-कोणते मुद्दे गाजणार?

आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही शक्तीपीठ महामार्गाला सरकारकडून मिळणारा पाठिंबा, त्याच बरोबर मंत्री संदिपान भुमरे आणि संजय शिरसाठ यांच्यावर झालेल्या आरोपांवरून देखील खडाजंगी होईल. त्याचबरोबर पुण्यातील हगवणे हुंडाबळी आणि तनिषा भिसे गर्भवती मृत्यू प्रकरण, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि आमदार बबनराव लोणीकर यांच्यासारखे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांमुळे देखील हे अधिवेशन चांगलंच गाजणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.

महाराष्ट्र मंत्रालयात राजेशकुमार राज्याचे नवे मुख्य सचिव; या तारखेपासून सांभाळणार पदभार

सकाळी 11 वाजता विधानसभा सुरू होईल. यावेळी नव्याने मंत्रिमंडळामध्ये सामील झालेल्या छगन भुजबळांचा सदस्यांना परिचय करून देण्यात येईल. त्यानंतर विधेयक पटलावर ठेवले जाईल. तसेच पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. तालुका अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाईल. या सर्व शासकीय कामानंतर शोक प्रस्ताव होईल. त्यानंतर सभागृह दिवसभरासाठी स्थगित होईल. त्यामुळे आता विरोधक कोणकोणत्या मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube