Makarand Anaspure Reaction On Hindi Mandatory Third Language : महाराष्ट्रात पहिली ते चौथीपर्यंत हिंदी ही तिसरी (Hindi Marathi Contraversy) भाषा म्हणून शिकवणे सक्तीचे करण्याच्या निर्णयावर राज्यभर तीव्र नाराजी (Marathi Contraversy) आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की ‘तीन भाषा सूत्रा’वर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी साहित्यिक, भाषा तज्ञ, राजकारणी आणि संबंधित पक्षांशी सविस्तर चर्चा केली जाईल. आता ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांनी देखील यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
पहिल्या इयत्तेपासून हिंदी भाषेची सक्ती अजिबात असू नये. कारण आपापल्या गरजेनुसार माणूस त्या त्या भाषेत संवाद साधतो. मी भोजपुरी सिनेमा केला आहे. मला भोजपुरी येत नाही, परंतु गरजेप्रमाणे सिनेमात ती बोललेलो आहे. इतक्या लहान वयात मुलगा मातृभाषा शिकत असताना त्याला हिंदीची सक्ती कशासाठी? आता मराठी आणि दोन्ही भाषा देवनागरी लिपी आहे, परंतु व्याकरणात बदल आहे.
Ahilyanagar : वाद विकोपाला! ८ वीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला संपवलं
मराठीमध्ये चेष्ठा म्हणजे टवाळी होते, तर हिंदीत चेष्ठा म्हणजे प्रयत्न होतो. दोन्ही भाषेत ऱ्हस्व आणि दिर्घचा प्रचंड फरक आहे. त्यामुळे मुलांचा भाषेसंदर्भात प्रचंड घोळ होईल, त्यामुळे हिंदी पहिल्या इयत्तेपासून सक्तीची नको, असं स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी मांडलेलं आहे. इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती असू नये. मुळात आधी मुलांना लहान त्यांची मातृभाषा शिकू दे, पुढे गरज पडेल तशी तो इतर भाषा शिकेल. लहान वयात कशाला भाषांचं ओझं मुलांवर लादायचं? असंही मकरंद अनासपुरे यांनी म्हटलेलं आहे.
ज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्याच्या सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणतात की सुरुवातीपासूनच मुलांवर अतिरिक्त भाषिक भार टाकणे योग्य नाही आणि हिंदीचा अभ्यास पाचवीपासून सुरू झाला पाहिजे.