Download App

भारत-चीनमध्ये दरी वाढली? चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी जी-20 परिषदेकडे पाठ फिरवली…

भारत-चीनमध्ये निर्माण झालेली दरी आता आणखीन वाढणार असल्याचं दिसून येत आहे, कारण भारतात पार पडणाऱ्या जी-20 परिषदेकडे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग जी-20 परिषदेत सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे, याउलट चीनचे पंतप्रधानांना ली कियांग या परिषदेसाठी पाठवण्यात येणार असल्याचं चीनकडून जाहीर करण्यात आलं आहे.

World Cup 2023 : चमकदार कामगिरी करूनही निवडकर्त्यांचं मनं जिंकू न शकलेले पाच खेळाडू

चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सांगितलं की, पंतप्रधान ली कियांग हे भारतातील नवी दिल्लीत होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेसाठी शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत, भारताच्या निमंत्रणानंतर आता ली कियांग हे 10 सप्टेंबरला होणाऱ्या जी-20 परिषदेत सहभागी होणार आहेत. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग परिषदेला येणार नसल्याने भारत-चीनमधला संघर्ष आणखीनच वाढणार असल्याची शक्यता आहे.

Pankaja Munde : पंकजा मुंडेंची शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू, आगामी निवडणुकांत समीकरणे बदलणार?

पुढे बोलताना माओ म्हणाले, ‘जागतिक अर्थव्यवस्था ढासळत चालली असून जागतिक विकासापुढे अनेक आव्हाने वाढत चालली आहेत. जी-20 हे आर्थिक सहकार्याचे मुख्य व्यासपीठ असून जी-20 मुळे जागतिक अर्थव्यवस्था, जागतिक विकासातील आव्हानांना तोंड देण्यासाठीच उपयुक्त ठरणार असल्याचंही माओ यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, शी जिनपिंग जी – 20 परिषदेला उपस्थित राहणार नसल्याने चीन भारतात होत असलेल्या जी-20 परिषदेला अधिक महत्व देत नसल्याचं दिसून येत आहे. याआधी जिनपिंग हे दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या BRICS परिषदेत सहभागी झाले, त्यानंतर आता ते भारतात येण्यासाठी टाळत असल्याचं दिसून येत आहे.

Tags

follow us