Download App

प्रेमासाठी पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू पुन्हा भारतात परतली! नसरुल्लासोबत लग्न करुन बनली होती फातिमा…

Anju Returned India : राजस्थानमधून (Rajasthan)प्रेमासाठी देशाची सीमा पार करत पाकिस्तानमध्ये (Pakistan)गेलेली अंजू पुन्हा भारतात परतली आहे. तिचा भारतामध्ये आल्याचा एक फोटो सोशल मीडियावर (Social media)चांगलाच व्हायरल झाला आहे. अंजूने आज अटारी-वाघा बॉर्डरवरुन(Attari-Wagah border) भारतामध्ये प्रवेश केला आहे. आत्ता ती बीएसएफच्या कॅम्पमध्ये (BSF Camp)आहे. सुरुवातीला अंजू पाकिस्तानमध्ये टुरिस्ट व्हिसावर गेली होती. काही दिवसानंतर ती खैबर पख्तुनख्वा येथे राहणाऱ्या नसरुल्लाला भेटायला गेल्याचे समोर आले. खरे तर नसरुल्लाह (Nasrullah)आणि अंजू यांच्यामध्ये अफेअर सुरु असल्याचीही माहिती समोर आली. काही दिवसांनी त्यांनी लग्न केल्याचेही समजले.

Uttarkashi Tunnel Rescue : योगा, मॉर्निंग वॉक काय-काय करत होते मजूर; पंतप्रधानांचा मजुरांशी संवाद

अंजूचं पाकिस्तानमध्ये जाण्याआधीच लग्न झालं होतं. तिचं लग्न अरविंद नावाच्या व्यक्तीशी झालं होतं. पण त्यानंतर ती आपल्या मुलांना आणि पतीला सोडून कागदपत्रं घेऊन पाकिस्तानमध्ये गेली होती. भारतामध्ये अंजू परत आली असली तरी देखील ती कायमची आली आहे की ती पुन्हा पाकिस्तानमध्ये जाणार? हे अद्याप समजले नाही.

पुणे महापालिका करणार मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार; आगामी निवडणुकीसाठी भाजपची ‘आयडिया’

2020 मध्ये अंजू आणि नसरुल्ला या दोघांची सोशल मीडियावर ओळख झाली. नसरुल्ला हा पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वामधील अप्पर दीर जिल्ह्यातील रहिवासी आहे. काही दिवसानंतर त्यांनी एकमेकांचे नंबर घेतले. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर त्यांचं बोलणं सुरु झालं. त्यांच्यामध्ये तब्बल दोन वर्ष बोलणं सुरु होतं.

त्यानंतर एकमेकांना भेटण्याची इच्छा झाली. मात्र नसरुल्लाने भारतात येण्यास नकार दिला. त्यानंतर अंजूने पाकिस्तानमध्ये जाण्यासाठी होकार दिला, आणि पासपोर्ट व्हिसा काढून ती टुरिस्ट म्हणून पाकिस्तानमध्ये गेली.

नसरुल्लाने पाकिस्तानी मीडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, आपण अंजूला सोडवण्यासाठी वाघा बॉर्डरवर स्वतः जाणार. ती भारतामध्ये आपल्या मुलांशी भेटेल. मुलांना अंजुसोबत पाकिस्तानमध्ये यायचे असेल तर ते येऊ शकतात.

अंजुला भारतातच राहायचे असल्यास तीने ते ठरवावं असंही तो म्हणाला. तो म्हणाला होता की, अंजू फक्त आपल्या मुलांना भेटण्यासाठी भारतात जायचे आहे. अंजूला तीच्या मुलांची खूप आठवण येत असल्यामुळे ती भारतात गेल्याचे नसरुल्लाने सांगितले आहे.

Tags

follow us