मोठी बातमी! खासदारांनंतर आमदारांचा गट फुटण्याची भीती?, उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

सचिन आहिर यांच्यानंतर अजूनही काही आमदार फुटणार का? अशी चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर थेट उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली होती.

News Photo   2026 07 05T144556.706

मोठी बातमी! खासदारांनंतर आमदरांचा गट फुटण्याची भीती?, उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे (Shinde) एका मागून एक मोठे धक्के देत आहेत. ठाकरे गटात मोठी बंडखोरी होत आहे. त्यामध्येच गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगत आहेत की, शिवसेना ठाकरे गटाचे काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. कोणत्याही क्षणी बंडखोरी होऊ शकते. यावरच आता उद्धव ठाकरे यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला.

उद्धव ठाकरे यांनी बंडखोरीच्या मुद्द्यात अधिक सर्तक राहण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बंडखोरी टाळण्यासाठी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरे यांच्याआदेशानंतर पक्षातील सर्व आमदारांसोबत संपर्क साधून त्यांना येत्या मंगळवारी रात्री 7 वाजता बैठकीस हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. पक्षाने ही तातडीची बैठक बोलावली आहे.

वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचंही नाव नाही; बाजू बदलताच नाव न घेता सचिन अहिरांचा आदित्य ठाकरेंवर वार

पक्षफुटीच्या चर्चांवर उद्धव ठाकरे स्वत: आमदारांसोबत संवाद साधणार आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये आमदार फुटणार नाहीत, याची काळजी उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतली जात आहे. सचिन आहिर यांच्यानंतर अजूनही काही आमदार फुटणार का? अशी चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर थेट उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली.

6 खासदारांनी ठाकरे गटातून बंडखोरी करण्यापूर्वीही खासदारांची बैठक उद्धव ठाकरे यांनी बोलावली होती. त्यावेळी काही खासदार ऑनलाईन पद्धतीने बैठकीत सहभागी झाली होती. मात्र, बैठकीत उपस्थित असलेल्या खासदारांनीही मोठी बंडखोरी केली. त्यानंतर या खासदारांच्या मतदार संघात जाऊन उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या आणि यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर उद्धव ठाकरे मुंबईत परत येताच थेट सचिन आहिर यांनी बंडखोरी केली.

Exit mobile version