Download App

आम आदमी विमा योजनेचा लाभ कसा मिळवावा?

LetsUpp l Govt. Schemes
ग्रामीण भागातील 18 ते 59 वयोगटातील सर्व प्रवर्गातील भूमिहीन शेतकरी मजूर यांना विमा संरक्षण व शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे.(Aam Aadmi Bima Yojana scholarship)

राज ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत ‘नाग-कोंबड्यां’ची एन्ट्री

योजनेसाठी अटी :
ग्रामीण भागातील 18 ते 59 वयोगटातील भूमिहीन शेतमजूरांना (Landless farm labourers)तसेच 2.5 एकर पेक्षा कमी बागायती व 5 एकर पेक्षा कमी जिरायती शेतजमीन धारण करणाऱ्यांना या योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. वार्षिक विम्याचा हप्ता रु.200/- इतका असून केंद्र शासनामार्फत रु.100/- व राज्य शासनामार्फत रु.100/- इतका विम्याचा हप्ता भारतीय आयुर्विमा महामंडळाला देण्यात येतो.

‘बीआरएस’चे नागपूरमध्ये पक्ष कार्यालय… भाजपच्या बालेकिल्ल्यातून प्रस्थापितांना हादरे देण्याची तयारी

लाभाचे स्वरूप :
– या योजनेंतर्गत खालीलप्रमाणे घटना घडल्यास लाभार्थीच्या वारसदारास / लाभार्थ्यास रक्कम दिली जाते.
– नैसर्गिक मृत्यू – रु. 30,000/-
– अपघाती मृत्यू – रु.75, 000/-
– अपघातात कायमचे अपंग – रु.75, 000/-
– अपघातात दोन्ही डोळे वा दोन्ही पाय गमावल्यास – रु.75, 000/-
– अपघातामुळे एक डोळा वा एक पाय गमावल्यास – रु.37, 500/-
– या योजनेंतर्गत लाभार्थीच्या 9 वी ते 12 वी इयत्तेत शिकणाऱ्या 2 मुलांना रु.100/- प्रतिमहा प्रति विद्यार्थी शिष्यवृत्ती देण्यात येते.

आवश्यक कागदपत्रे :
– आधार कार्ड
– जन्माचा दाखला
– शाळा सोडल्याचा दाखला
– मतदान कार्ड
– रेशन कार्ड

संपर्क कार्यालयाचे नाव : जिल्हाधिकारी कार्यालय/ तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय

Tags

follow us