Abu Azmi on Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) जीवनावर आधारित ‘छावा’ (Chhava Film) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात संभाजीराजेंचे शौर्य दाखवण्यात आलं. तसेच औरंगजेबाने (Aurangzeb) संभाजीराजेंना कसं छळलं, हेही दाखवण्यात आलं. या चित्रपटाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत असतानाच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी धक्कादायक विधान केलं. औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, अशी स्तुतीसुमनं आझमींनी उधळली. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात धर्माची लढाई नव्हती, असंही ते म्हणाले.
रणवीर अलाहाबादियाला दिलासा! शो सुरू करण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी; मात्र एका अटीवर
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले. सपा नेते अबू आझमी यांनीही अधिवेशनाला हजेरी लावली. या वेळी सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि ब्रह्मदेशापर्यंत होती. त्या काळात आपला जो जीडीपी होती, तो २४ टक्के होता. भारताला ‘सोने की चिडीया म्हटलं जायचचं. या सगळ्या गोष्टींना मी चुकीचं म्हणू का, असा सवाल आझमींनी केला.
अबू आझमी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई ही सत्तेसाठी होती. ही लढाई धर्मासाठी होती.. हे जर कोणी बोलत असेल तर ते मी मानत नाही, असंही आझमी यांनी म्हटलं.
लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरेंनी तारीखच सांगितली…
आझमींना इतिहासाचे पुस्तक भेट देणार
दरम्यान, अबू आझमी यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून टीका होत आहे. भाजप आमदार राम कदम यांनी आझमी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. अबू आझमींना इतिहासाचे पुस्तक भेट द्यायला हवे. उद्या ते सभागृहात येतील तेव्हा मी त्यांना इतिहासाचे पुस्तक भेट देईन. औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना कसे छळले आणि त्यांना कसे कैदेत ठेवलं हे त्यांना माहित नाही का, असा सवाल कदम यांनी केला.