Aditya Thackeray on Dada Bhuse : दहावीचे निकाल येऊन १ महिना उलटला आहे. १३ मेला १० वीचा निकाल आला. (Thackeray) ऑनलाईन अर्जाची सिस्टम काही ठरावीक शहरात होती. पण, अचानक ठरले कोणतेही फॉर्म भरा पण त्या विन्सेस्ट माध्यमातून सुरू केली. पहिल्याच दिवशी साईड क्रैश झाल्याने पहिली यादी आली नाही. १० जूनला म्हणाले आले नाही. मग सांगितले २६ जूनला येईल मात्र, आली नाही. त्यामुळे या खात्यात सगळा सावळा गोंधळ सुरू आहे असा घणाघात ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
प्रत्येक खात्यात याचा जर रिपोर्ट काढला तर फेल फेल येईल असं म्हणत या खात्यात नुसता गोंधळ घातला आहे असंही ते म्हणाले. फडणवीस याकडे पाहणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत घाणेरडे राजकारण बाजूला ठेवा स्वतःचे सरकार आणि मंत्रिपद द्यायला २ महिने लागले हा सगळा घोळ निस्तरायला किती महिने लागणार असंही ते म्हणाले आहेत. आज जर यादी लागली नाही तर युवासेना राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा देत थेट दादा भुसे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याचीच मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
पहिली ते तिसरीपर्यंत.. शिक्षणमंत्र्यांचं हिंदीबाबत मोठं वक्तव्य, दादा भुसेंनी काय सांगितलं?