Download App

BRS Meeting : पक्षविस्तारासाठी केसीआर यांचा मराठवाड्याकडे मोर्चा, छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य सभा

BRS Meeting In Chhatrapati Sambhaji Nagar: के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला आहे. या प्रवेशाची नांदी करताना त्यांनी राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची पहिली सभा रविवारी 5 एप्रिल नांदेड येथे पार पडली. त्यावेळी के. चंद्रशेखर राव हे शेतकऱ्यांना संबोधित होते.यावेळी हजारोंच्या संख्येने नांदेड आणि आजुबाजूच्या भागातील शेतकरी उपस्थित होते.

त्यावेळी ते म्हणाले होते की, आपली चूक काय झाली माहितीय का? आपण हल (शेती) चालवत राहिलो आणि कलम (पेन) चालवण्याची जबाबदारी दुसऱ्यांना दिली. त्यामुळे आपण मागे राहिलो. जयप्रकाश नारायण यांच्या एका आवाजामुळे सर्व देश एकत्र आला होता. आता ती वेळ परत आली आहे. आपण सर्व शेतकरी एकत्र येऊन या देशात खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे सरकार आले पाहिजे. त्यामुळे आपला नारा ‘अब की बार किसान सरकार’ हा आहे. तो तुम्ही घरोघरी द्या. बघा कसा बदल होतोय की नाही आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केला होता.

त्यानंतर आता राज्यातील अनेक नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केल्यानंतर के. चंद्रशेखर राव यांनी आपला मोर्चा छत्रपती संभाजीनगरकडे वळवला आहे. आज 24 एप्रिलला बीआरएसचा दुसरी सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडणार आहे.

पक्षाची सभा अगोदर आमखास मैदानावर सभा घेण्याचं पक्षाचं नियोजन होते. मात्र पोलिसांनी आयोजकांना जागा बद्दलण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार आता सभा बीड बायपास येथील जबिंदा मैदानावर होणार आहे. त्यामुळे आता या सभेमध्ये के. चंद्रशेखर राव काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

BRS Meeting : के. चंद्रशेखर रावांच्या छत्रपती संभाजीनगरमधील सभेला परवानगी मिळाली पण

दरम्यान या सभेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये रेणुका माता कमान (द्वारकादास शामकुमार कपड्याचे शोरुम) समोरील बीड बायपासरोड लगत मैदान व गोदावरी टीच्या दक्षिण बाजूस असलेले चौधरी मैदान, गुरुकुल शाळाचे मैदान, जबिंदा RMC Plant मैदान येथे वाहने पार्किंग येथे शहरी आणि ग्रामीण अशी वेगवेगळी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात प्रवेश करताच, राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी पक्षात प्रवेश केलाय. यामध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना, माजी आमदार अण्णासाहेब माने, राष्ट्रवादीचे नेते संतोष माने, राष्ट्रवादीचे नेते प्रदीप सोळुंके शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी, फेरोज पटेल यांच्यासह अनेक नेत्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. तर काही दिवसांपूर्वीच माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी देखील आणखी 40 माजी नगरसेवकांसह माजी आमदार आणि खासदार देखील बीआरएसमध्ये येणार असल्यांचं सांगितलं आहे.

Tags

follow us