Download App

Sambhajiraje Chhatrapati मोठी घोषणा; विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार

  • Written By: Last Updated:

आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजीराजेंनी केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी असला तरी संभाजीराजेंनी मात्र रणशिंग फुकले आहे. परळीमध्ये माधवराव जाधव यांच्या मित्र मंडळ कार्यालयाच्या उद्घाटनासाठी संभाजीराजे आले होते. यादरम्यान त्यांनी सरकारवर देखील सडकून टीका केली आहे.

बीड जिल्हातील परळी शहरात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांना संभाजीराजे परळी मतदारसंघातून उमेदवार देणार का? असा प्रश्न विचारला त्यावर बोलताना ते म्हणाले की, “आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष परळीसह संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभा करणार आहे.”

Sanjay Raut : सरकार गेंड्याच्या कातडीचं, त्यांना मन असतं तर…

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, 2024 मध्ये स्वराज्य पक्ष हा कुठल्याही परिस्थितीत राजकारणात येणार असून प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभा करणार आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी स्वराज्य पक्ष कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितलं.

यावेळी सभेत बोलताना ते म्हणाले की,  छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आणि स्वराज्यात कुठेही दहशत नव्हती. परळीतील दहशत ऐकून मला देखील धक्का बसला पण ती कमी नाही झाली, सावकारी कमी झाली नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीतली धोरण देखील बदलली पाहिजेत. दुष्काळ, ओला दुष्काळ, गारपीट अशा नैसर्गिक आपत्ती संदर्भात शेतकऱ्यांसाठी दूरदृष्टी कोणातून निर्णय घेणे गरजेचे आहे.

2019 ला यांना खुर्ची देताना ठाकरेंनी धर्मांतर केलंयं; राणेंचा हल्लाबोल

बारसू रिफायनरी संदर्भात छत्रपती संभाजीराजेंना विचारले असता, स्वराज्य हे प्रो विकासासाठी असतं रिफायनरीचे दुष्परिणाम सुद्धा होवू नये. शेतकरी का विरोध करत आहेत… माझं म्हणणं आहे की, त्या स्थानिकांचा पर्यावरण आणि रोजगार या सर्व गोष्टींचा विचार व्हायला हवा. मात्र विकासासाठी स्वराज्य कधीही विरोध करत नाही.

Tags

follow us