Download App

VIDEO : निवडणूक आयुक्तांचं EVM बाबत मोठं विधान म्हणाले, “ईव्हीएमध्ये कोणतीही..”

जनता मतदानात सहभागी होऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत असते. ईव्हीएमचा प्रश्न असेल तर ईव्हीएम 100 टक्के फूलप्रूफ आहेत.

Maharashtra Jharkhand Assembly Elections 2024 : महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधी विरोधी पक्षांकडून पुन्हा ईव्हीमएमवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर आता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जनता मतदानात सहभागी होऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत असते. ईव्हीएमचा प्रश्न असेल तर ईव्हीएम 100 टक्के फूलप्रूफ आहेत. राजीव कुमार यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधला. राजीव कुमार म्हणाले, याआधीही अनेकदा एक गोष्ट सिद्ध झाली आहे की ईव्हीएम बरोबर आहेत. यामध्ये कोणत्याच प्रकारची अडचण नाही.

लोकसभेत सरस तरीही विधानसभेसाठी फक्त 75 जागा?; पवारांच्या गुगलीनं सर्वचं बुचकळ्यात

: राज्याच्या विधानसभा निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणा आहे. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करतील अशी शक्यता आहे. आयोगाने या निवडणुकांची तयारी पूर्ण केली आहे. यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. याआधी राजीव कुमार यांनी ईव्हीएमबाबत महत्वाची माहिती दिली.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा ईव्हीएमला दोष देण्यास सुरुवात केली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी पवन खेडा आणि जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या त्रुटींबाबत माहिती दिली होती. ईव्हीएममधील बॅटरीवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी तक्रारही केली होती. यानंतर राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी (11 ऑक्टोबर) ईव्हीएमवर संशय व्यक्त केला होता.

ईव्हीएमच्या सध्याच्या व्यवस्थेमुळे मतदारांच्या रुपात त्यांचा संवैधानिक अधिकारी हिरावून घेतला गेला आहे असे दिग्विजय सिंह म्हणाले होते. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीप्रमाणेच हरियाणाच्या निवडणुकीतही टपाली मतपत्रिकांच्या मोजणीत काँग्रेस बहुतांश मतदारसंघात विजयी झाला होता असा दावा दिग्विजय सिंह यांनी केला होता.

“आमचा महाविकास आघाडीला पाठिंबा पण काही..”, असीम सरोदेंनी नेमकं काय सांगितलं?

महाराष्ट्र, झारखंडमध्ये बॅलेट पेपरवर मतदान घ्या

काँग्रेस नेते राशिद अल्वींनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुका बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात विरोधी पक्षांनी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदानासाठी आग्रह धरला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रात भाजप आणि निवडणूक आयोग काहीही करू शकतात. ईव्हीएमचा खेळ कुठेही होऊ शकतो आणि यासाठी भाजप निवडणुकीआधी हा सगळा प्रकार करू शकतो असा खळबळजनक आरोप राशिद अल्वी यांनी केला.

follow us