Harshvardhan Sapkal On Devendra Fadnavis : पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती करण्यात येणार असल्याने या प्रकरणावरुन सध्या राज्याचा राजकारण चांगलंच तापलं आहे. महायुती सरकारवर विरोधक जोरदार टीका करत हा निर्णय रद्द करण्याची मागणी करत आहे. तर आता या प्रकरणावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. हर्षवर्धन सपकाळ आज पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
पत्रकार परिषदेमध्ये बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, महाराष्ट्र काँग्रेस हिंदी सक्तीच्या विरोधात आहे. सरकारने हा निर्णय रद्द केलाच पाहिजे हा राजकीय मुद्दा नाही तर संस्कृतिक मुद्दा आहे. शिवसेना ठाकरे गटाने आणि काँग्रेसने हिंदी सक्ती विरोधात भूमीका घेतली आहे. अशीच भूमिका सर्व राजकीय पक्षांनी घेतली पाहिजे असं पत्रकार परिषदेमध्ये बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी आम्ही मराठी अभ्यास केंद्राच्या चळवळीसोबत आहोत अशी घोषणा देखील केली.
देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा : हर्षवर्धन सपकाळ
तर दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोगावरुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी सपकाळ म्हणाले की, काल राहुल गांधी यांचं एक ट्विट देशाच्या लोकशाहीसाठी स्फोटक ठरले आहे. निवडणूक आयोगाचे काम पारदर्शक प्रक्रिया पार पाडणे आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. आज निवडणूक आयोगाच्या कामावर डाग लागले आहे. देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाचे लाभार्थी आहे त्यामुळे ते टिपण्णी करत आहेत. त्यांना कुठलीही शरम नाही. देवेंद्र फडणवीस यांना मतांची चोरी करून जिंकून यावं लागतं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. याला केवळ नैतिकतेचा आधार आहे आणि चौकशी लावावी. 8% मतदान कस वाढलं हे ते सांगू शकत नाही. मतांची चोरी झालेली आहे हे सिद्ध झालेल आहे. अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली आहे.
अजितदादाच किंगमेकर! ‘माळेगाव’ कारखाना निवडणुकीत 9 उमेदवार विजयी; तावरेंचा पराभव
तर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती आणि माहितीच्या अधिकारातून माहिती मिळाली की 8टक्के मतदान वाढले आहे. या प्रकरणात दोन याचिका दाखल करण्यात आले आहे. एक सीसीटिव्ही आणि दुसरी मतदान कसं वाढले. मतदान नोंदणीसाठी एक विशिष्ट मोबईल वापरले गेले आहेत. एकाच पद्धतीचा विशिष्ट मोबाईल वापरण्यात आले असल्याचा आरोप देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.